शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आयआयटी मद्रासमध्ये बीफ महोत्सव

By admin | Updated: May 29, 2017 13:43 IST

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ऑनलाइन लोकमत

तामिळनाडू, दि. 29- आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.  बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याच्या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत तसंच आपला निषेध नोंदविण्यासाठी आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या बीफ महोत्सवाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बीफ महोत्सवात आयआयची मद्रासमधील 50 ते 60 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे. 

"सरकारचा निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे बीफ फेस्टिव्हला पाठिंबा दिला, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून हे झालं नसल्याचं", आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. काय खायचं हे निवडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. 
 
याआधी केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी सोमवारी युथ काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युथ काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिकाणी आणून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचं मांस लोकांना वाटण्यात आलं होतं. आठवडी बाजारात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी आणि विक्री बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होते. दरम्यान, काँग्रेसनेही या कृत्याचा निषेध करत कार्यकर्त्यांना निलंबित केलं आहे. हे कृत्य पूर्णपणे असमर्थनीय असल्याचं कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.  
आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर पर्यावरण मंत्रालयाकडून बंदी टाकण्यात आली आहे. या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. आम्ही काय खायचं हे दिल्ली आणि नागपुरकरांनी शिकवायला नको, अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असणारं सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहे. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूरमधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे देण्याची आवश्यकता नाही, असं विजयन यांनी सांगितलं आहे. केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात, असंही विजयन पुढे म्हणाले आहेत.