शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी मद्रासमध्ये बीफ महोत्सव

By admin | Updated: May 29, 2017 13:43 IST

आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.

ऑनलाइन लोकमत

तामिळनाडू, दि. 29- आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये बीफ महोत्सवाचं आयोजन केलं होतं. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी या बीफ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.  बाजारात कत्तलीसाठीच्या जनावरांची खरेदी-विक्री करण्याच्या बंदीमागे गोमांसबंदीचा निर्णय अप्रत्यक्षपणे राबवण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप करत तसंच आपला निषेध नोंदविण्यासाठी आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचं आयोजन केलं होतं. या बीफ महोत्सवाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. बीफ महोत्सवात आयआयची मद्रासमधील 50 ते 60 विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती मिळते आहे. 

"सरकारचा निर्णयाचा निषेध करण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे बीफ फेस्टिव्हला पाठिंबा दिला, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून हे झालं नसल्याचं", आयआयटी मद्रासच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे. काय खायचं हे निवडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. 
 
याआधी केरळमध्ये सार्वजनिक ठिकाणी गायीच्या वासराची कत्तल केल्याप्रकरणी सोमवारी युथ काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. भाजप युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी कन्नूर युथ काँग्रेसचे अध्यक्ष राजील माकुट्टी यांच्यासह तीन जणांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे या तिघांनी गायीच्या एका वासराला सार्वजनिक ठिकाणी आणून त्याची कत्तल केली. त्यानंतर या वासराचं मांस लोकांना वाटण्यात आलं होतं. आठवडी बाजारात कत्तलीसाठी जनावरांची खरेदी आणि विक्री बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं होते. दरम्यान, काँग्रेसनेही या कृत्याचा निषेध करत कार्यकर्त्यांना निलंबित केलं आहे. हे कृत्य पूर्णपणे असमर्थनीय असल्याचं कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे.  
आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर पर्यावरण मंत्रालयाकडून बंदी टाकण्यात आली आहे. या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. आम्ही काय खायचं हे दिल्ली आणि नागपुरकरांनी शिकवायला नको, अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. केरळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत असताना त्यांनी भाजपच्या निर्णयावर सडकून टीका केली. केंद्रात सत्तेत असणारं सरकार आपल्या भूमिका देशभरात लादू पहात आहे. मात्र केरळमधील लोकांच्या खाण्याच्या सवयी अतिशय चांगल्या असून दिल्ली आणि नागपूरमधून केरळी लोकांना खाण्याच्या बाबतीतले धडे देण्याची आवश्यकता नाही, असं विजयन यांनी सांगितलं आहे. केरळी लोक खाण्याच्या आरोग्यदायी आणि पोषणमूल्ये असणाऱ्या पारंपरिक पद्धती अवलंबतात, असंही विजयन पुढे म्हणाले आहेत.