शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

सावधान ! या तीन राज्यांमध्ये घुसलेत दहशतवादी

By admin | Published: March 21, 2017 2:01 PM

भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे.

 ऑनलाइन  लोकमत

कोलकाता, दि. 21 - भारतात होणा-या दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या पार्श्भूमीवर बांगलादेश सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला सतर्क करण्यासाठी एक अहवाल पाठवला आहे. या अहवालानुसार, 2015च्या तुलनेत 2016मध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात  हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेच्या दहशतवाद्यांची घुसखोरी तीनपट अधिक संख्येने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. 
 
ऑक्टोबर 2014 मध्ये बर्दवान जिल्ह्यातील खागरागडमध्ये झालेल्या स्फोटाचे संबंध जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश संघटनेशी मिळतेजुळते असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे, त्यामुळे बांगलादेशकडून देण्यात आलेला अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. हरकत-उल-जिहादी अल-इस्लामी (HuJI) आणि जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (JMB) संघटनेचे 2 हजारहून अधिक दहशतवादी या तिन्ही राज्यांमध्ये घुसल्याचे, या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील जवळपास 720 बंगालच्या सीमेवर आणि उर्वरित 1,290 संशयित आसाम आणि त्रिपुराच्या सीमावर्ती भागात असल्याची माहिती आहे.
 
दरम्यान, अहवालासंदर्भात प.बंगाल सरकारच्या अधिका-यांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र संशयित दहशतवाद्यांची संख्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजाच्या आसपास असली तरी समस्या आहेच कारण गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, 2014 मध्ये 800 आणि 2015 मध्ये 659 जणांनी घुसखोरी केली आहे. यामुळे अहवालाची सत्यता पडताळून पाहत असल्याची माहिती येथील गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. तर, आसाम पोलिसांनी  चिंता व्यक्त केली आहे.  आसाममध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या 6 महिन्यात आसाममध्ये 'जमाल उल मुजाहिद्दीन बांगलादेश' (जेएमबी) या दहशवादी संघटनेच्या 54 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी पोलीस अधिकारी आणि आमदारांची एक समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती आसामचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पल्लव भट्टाचार्य यांनी दिली.
 
दरम्यान, जेएमबीचा सेक्रेटरी इफ्तादूर रहमान हा 12 जानेवारी रोजी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आला असून पश्चिम बंगालमधील अनेकांशी संपर्क साधून आहे. तो दिल्लीलाही जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इफ्तादूरचे खरे नाव सज्जाद हुसैन आहे. 18 जानेवारी रोजी मायमेनसिंह जिल्ह्यात एक बैठक झाली होती. या बैठकीत आसाम, पश्चिम बंगाल आणि नवी दिल्लीतील काही जण आणि जेएमबी व एयूजेआयचे दहशतवादी सहभागी झाले होते.