बावनथडी जोड
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:44+5:302014-12-18T00:40:44+5:30
....चौकट...........

बावनथडी जोड
.... चौकट...........मागण्या काय?बावनथडी प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, नोकरीत सामावून घेणे शक्य नसल्यास प्रकल्पग्रस्त कुटुंबाला ५० लाख रुपये देण्यात यावे, प्रकल्पग्रस्त प्रत्येक कुटुंबाला पाच एकर शेती देण्यात यावी, पुनर्वसनात बऱ्याच कुटुंबाना प्लॉट मिळालेले नाही; ते देण्यात यावे, प्रत्येक कुटुंबाला बीपीएलचे रेशनकार्ड देण्यात यावे, पिंडकेपार येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व विद्युत पुरवठा करण्यात यावा, घरांसाठी अनुदान द्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे...........चौकट........ही तर प्रकल्पग्रस्तांची थट्टाचबावनथडी प्रकल्पात ज्यांची शेती गेली, त्यांची जणू शासनाने थट्टाच केली. शेतजमिनीचा तेव्हाच्या बाजारभावानुसार मोबदला देण्यात आला. तो अल्प नव्हे तर अत्यल्प आहे. मुरझोड येथील शेतकरी अरुण पंचमराव यांची १० एकर शेती प्रकल्पात गेली. या शेतीचा मोबदला त्यांना केवळ १४९९ रुपये देण्यात आला. त्याच्यासोबतच इतरही शेतकऱ्यांना ७०० ते ३००० रुपयांपर्यंत मोबदला दिला. ही थट्टा नाही तर काय?..........फोटोओळ : बावनथडी प्रकल्पात शेती, घर गेलेल्या या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.