बावनथडी
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30
प्रकल्पाने हिरावला आमचा रोजगार

बावनथडी
प रकल्पाने हिरावला आमचा रोजगारबावनथडी प्रकल्पग्रस्तांची व्यथा : ५ महिलांचे आमरण तर १५ नागरिकांचे साखळी उपोषणगणेश खवसे ० नागपूरगाव प्रकल्पात गेले अन् सुखी संसाराला जणू दृष्टच लागली. प्रकल्पासाठी शेती अधिग्रहित केली, घरांवर बुलडोझर चालले. नवीन ठिकाणी गावांचे पुनर्वसन केले. परंतु, तेथेही समस्यांनी प्रकल्पग्रस्तांना घेरले. रोजगार हिरावला आणि उपाशी राहण्याची वेळ आली. या समस्यांना वाचा फुटावी, यासाठी प्रकल्पग्रस्तांपैकी ५ महिलांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. त्यांच्यासोबत १५ प्रकल्पग्रस्त साखळी उपोषण करीत आहे. मात्र त्यांच्या समस्यांची दखल घ्यायला तेथे कुणीच फिरकले नाही, हे वास्तव आहे.महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातील आठ गावांसाठी बावनथडी प्रकल्प जणू डोकेदुखीच ठरला. १९७५ च्या दरसूचीनुसार या प्रकल्पाची किंमत २३.४७ कोटी एवढी होती. तिसऱ्या दरसूचीनुसार तो ५६१.३६ कोटी तर २००८-०९ च्या चतुर्थ दरसूचीनुसार हा प्रकल्प १४०७.१९ कोटी रुपयांवर गेला. या प्रकल्पाने नागपूर जिल्ह्यातील पुसदा, चिकनापूर, पिंडकेपार, मुरझड व सीतेपार (टोला) ही पाच गावे तर भंडारा जिल्ह्यातील सीतेकसा, सुसुरडोह व कमकासूर ही तीन गावे बाधित झाली. या आठ गावातील एकूण ७५६ कुटुंबापैकी ७२० कुटुंबाचे स्थलांतरण पुनर्वसित ठिकाणी झाले. मात्र तेथे नागरी सुविधांचा अभाव आहे. पुनर्वसन ठिकाणी रोजगाराची साधने नाही. अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा अत्यल्प मोबदला दिला. याविरोधात जनसमस्या अन्यायग्रस्त समितीच्या माध्यमातून सारजा उईके, जानू शेंदरे, रत्ता खंडाते, भिवरी उईके, जयवंती कोरचे, रेखा उईके यांनी संगीता खुरपे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू केले आहे. तर मायराम मसरकोल्हे, सुखराम कोरचे, मुखचरण उईके, भाऊलाल उईके, सुखराम उईके, जयराम गोंडगे, अरविंद धुर्वे, फुलचंद खुरपे यांच्यासह इतरांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, २०१३ च्या हिवाळी अधिवेशनात सारजा उईके आणि संगीता खुरपे यांनी आमरण उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्यांची अद्याप शासनाने दखल घेतलेली नाही.