शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:24 IST

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे.

बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगच मतांची चोरी करत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मौन सोडत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"मतांची चोरी केली जात आहे. आमच्याकडे ठोस पुरावा आहे की, निवडणूक आयोगच मतांच्या चोरीमध्ये सहभागी आहे. मी हे मस्करीत बोलत नाहीये. मी हे शंभर टक्के पुराव्यानिशी बोलत आहे", असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. त्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला. 

राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असताना आता निवडणूक आयोगाने यावर उत्तर दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दररोज केल्या जात असलेल्या निराधार आरोपांकडे आयोग दुर्लक्ष करतो. दररोज धमक्या दिल्या जात असतानाही निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत असलेल्या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊ नये."

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणूक कर्मचाऱ्यांनी दररोज होत असलेल्या या आरोपांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही केले आहे. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मतदार यांद्यामध्ये बोगस मतदार आढळून आल्यानंतर आयोगाने मतदार यादी पुर्नपरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून शंका व्यक्त करत आरोप केले जात असून, आता राहुल गांधींनी थेट मतांची चोरी होत असून, निवडणूक आयोगच त्यात भागीदार असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस