शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:24 IST

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाला लक्ष्य केले. राहुल गांधींनी गंभीर आरोप आयोगावर केले, त्यावर आयोगाने भूमिका मांडली आहे.

बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरून केंद्रीय निवडणूक आयोगावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगच मतांची चोरी करत आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी संसद परिसरात माध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मौन सोडत राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर भूमिका मांडली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

"मतांची चोरी केली जात आहे. आमच्याकडे ठोस पुरावा आहे की, निवडणूक आयोगच मतांच्या चोरीमध्ये सहभागी आहे. मी हे मस्करीत बोलत नाहीये. मी हे शंभर टक्के पुराव्यानिशी बोलत आहे", असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केला. त्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला. 

राहुल गांधींनी केलेल्या विधानावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असताना आता निवडणूक आयोगाने यावर उत्तर दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, "दररोज केल्या जात असलेल्या निराधार आरोपांकडे आयोग दुर्लक्ष करतो. दररोज धमक्या दिल्या जात असतानाही निष्पक्ष आणि पारदर्शकपणे काम करत असलेल्या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांनी अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊ नये."

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेला आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्याचबरोबर निवडणूक कर्मचाऱ्यांनी दररोज होत असलेल्या या आरोपांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहनही केले आहे. 

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. मतदार यांद्यामध्ये बोगस मतदार आढळून आल्यानंतर आयोगाने मतदार यादी पुर्नपरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यावर विरोधी पक्षांकडून शंका व्यक्त करत आरोप केले जात असून, आता राहुल गांधींनी थेट मतांची चोरी होत असून, निवडणूक आयोगच त्यात भागीदार असल्याचे म्हटले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेस