शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धरामय्या कुमारस्वामींवर पुन्हा नाराज; आता फिल्म सिटीवरुन नाट्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 18:11 IST

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे.

बंगळुरु- कर्नाटक सरकारमधील ओढाताण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना पुन्हा एकदा नव्या विषयावर आपली नाराजी कळवली आहे. सरकारच्या विविध निर्णयांवर सिद्धरामय्या यांनी अनेकदा नापसंती व्यक्त केली आहे.

फिल्म सिटीचा प्रकल्प रामनगर येथे स्थापन केला जाऊ नये असे सिद्धरामय्या यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिले आहे. सिद्धरामय्या यांनी गेल्या दोन महिन्यात मुख्यमंत्र्यांना लिहिलेले हे पाचवे पत्र आहे. सिद्धरामय्या गेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीही होते. गेल्या सरकारचे शेवटचे बजेट सादर करताना त्यांनी म्हैसुर येथे फिल्मसिटी स्थापन  करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र सध्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी हा निर्णय बदलून फिल्म सिटी रामनगर येथे नेण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलच सिद्धरामय्या यांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. कुमारस्वामींनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

कन्नड अभिनेता राजकुमार याने फिल्म सिटी म्हैसुरमध्ये असणे हिताचे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांचाही उल्लेख सिद्धरामय्या यांनी पत्रात केला आहे. म्हैसुरमध्ये फिल्मसिटीचे काम सुरु झाले असून कन्नड चित्रपटसृष्टीच्या हिताच्या दृष्टीने कुमारस्वामींनी निर्णय घ्यावा असे सिद्धरामय्या यांनी पत्रात नमूद केले आहे.कुमारस्वामी यांच्या जेडी (एस) काँग्रेस आघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यापासून सिद्धारामय्या यांनी कुमारस्वामी आणि त्यांच्या मंत्र्यांना समस्यांचा पाढा वाचणारी पत्रे पाठवण्याचा धडाका लावला आहे. यापैकी बहुतांश पत्रांमध्ये सिद्धारामय्या यांनी त्यांच्या बदामी या मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला आहे. तसेच खनिज तेलावरील कर वाढवण्याच्या तसेच पीडीएस-बीपीएल कुटुंबीयांसाठी देण्यात येणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्यात घट करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे. 

सिद्धारामय्या यांच्या या पत्रांमुळे  कुमारस्वामी चांगलेच त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आघाडी सरकार चालवतानाच्या अडचणींचा पाढा वाचला होता. दरम्यान, कुमारस्वामी यांना डिवचण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी सिद्धारामय्या हा पत्रप्रपंच करत असल्याचे मत राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :siddaramaiahसिद्धरामय्याkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारण