शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 14:35 IST

भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देगेल्या सोमवारी भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. भारताने चीनला धडा शिकवण्याचा दृढनिश्चय केला आहे. सध्या भारत चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे.

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे. गेल्या सोमवारी भारताने टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. ही बंदी घातल्यानंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, देशवासीयांच्या रक्षणासाठी भारत डिजिटल स्ट्राइकही सुद्धा करू शकतो. भारताची सुरक्षा आणि सार्वभौमत्वासाठी, देशवासियांची डिजिटल सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी टिकटॉकसह  59 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

भारताला आपल्या सीमेवर डोळ्यात डोळे घालून बोलणे माहीत आहे आणि भारताला लोकांच्या संरक्षणासाठी डिजिटल स्ट्राइक करणे सुद्धा माहीत आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, ते म्हणाले की मोबाइल अ‍ॅप्सच्या बाबतीत देशाला स्वावलंबी बनवावे लागेल. याआधी डिजिटल इंडियाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते की, "आम्ही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे, मला वाटते ही मोठी संधी आहे. भारतीयांनी बनवलेले चांगले अ‍ॅप्स मार्केटमध्ये येऊ शकतात? आपल्याला बर्‍याच कारणांमुळे आपल्या अजेंडावर चालणार्‍या परदेशी अ‍ॅप्सवर अवलंबून राहणे थांबवावे लागेल."

भारताकडे टॅलेंटची कमतरता नाही. सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच, या टॅलेंटला आपल्यासारख्या (इन्फोसिसचे नंदन निलेकणी) लोकांच्या मदतीची आवश्यकता आहे. देशात सार्वजनिक खाजगी भागीदारीची मोठी शक्यता आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले होते. याशिवाय, आमचे उद्दिष्ट सॉफ्टवेअरच्या क्षेत्रातही भारताला स्वावलंबी बनविणे आहे. त्यासाठी स्टेक होल्डरसोबत चर्चा करून धोरण आखले गेले आहे. सर्व डिजिटल माध्यमामध्ये आत्मनिर्भर राहून भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा, अशी आमची इच्छा आहे. भारत हा जगातील सॉफ्टवेअर हब बनला पाहिजे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले होते.

दरम्यान, 15 जूनला पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिक यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. या घटनेनंतर भारताने चीनला धडा शिकवण्याचा दृढनिश्चय केला आहे. भारत सध्या चीनला आर्थिक आघाडीवर धक्का देत आहे.  गेल्या सोमवारी मोदी सरकारने टिकटॉक, शेअरईट, हॅलो, यूसी ब्राउझर ​​यासह एकूण 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे.

याशिवाय, बुधवारी बीएसएनएल आणि एमटीएनएलने आपले 4 जी टेंडर रद्द केले आहे. आता पुन्हा नवीन टेंडर जारी केले जाणार आहे. सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलला चिनी कंपन्यांकडून वस्तू न खरेदी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर यासंबंधीच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. आता नव्या निविदेत मेक इन इंडिया आणि भारतीय टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन तरतुदी असणार आहेत.

विशेष म्हणजे, बीएसएनएल आणि एमटीएनएलवर सर्वाधिक चिनी उत्पादने खरेदी केल्याचा आरोप होता. यानंतर सरकारने निर्देश दिला होता की, सरकारी कंपन्यांनी चिनी कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळावे. याचबरोबर, भारत आता सर्व महामार्ग प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांवर बंदी घालण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. चिनी कंपन्यांना संयुक्त उद्योजक भागीदार (जेव्ही) म्हणून काम करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

आणखी बातम्या...

ड्रॅगनला नरेंद्र मोदींचा दणका, Weibo वरून एक्झिट घेण्याचा निर्णय

तीन वर्षांच्या मुलाला वाचवणाऱ्या जवानाचं होतंय कौतुक, पण ओमर अब्दुल्लांकडून प्रश्नचिन्ह!

चीनला आणखी एक धक्का; BSNL-MTNL कडून 4G टेंडर रद्द!

'त्या' एका घटनेमुळं बदललं आयुष्य अन् बनली आयपीएस अधिकारी!

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसादChinese Appsचिनी ऍपtechnologyतंत्रज्ञान