शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

अनधिकृत व्यवहारांपासून सुरक्षित ठेवणे, फसवणुकीची रक्कम देणे बँकांची जबाबदारी: कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 12:31 IST

६ जुलै २०१७ च्या आरबीआय परिपत्रकात काय? वाचा सविस्तर

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ग्राहकांना अनधिकृत व्यवहारांपासून सुरक्षित ठेवणे बँकांची  जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ‘एसबीआय’ला फसव्या व्यवहारांची रक्कम ग्राहकाला परत करण्याचे निर्देश दिले. आसामच्या ज्योती यांचे एसबीआयमध्ये खाते होते. त्यांच्या खात्यात ८ मे ते १७ मे २०१२ दरम्यान ४ लक्ष ४५ हजारांचे अनधिकृत ऑनलाइन व्यवहार झाले. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर त्यांना या व्यवहारांचे कोणतेही ओटीपी किंवा एसएमएस अलर्ट मिळाले नाहीत. त्यांनी हे बँक आणि पोलिसांना कळवले.

ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे हे झाले असे एसबीआयने म्हटले. पोलिस तपासात मात्र ठाणे येथून हा सायबर गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले. यानंतरही एसबीआयने ज्योती यांचा दावा फेटाळला, म्हणून त्यांनी गुवाहाटी हायकोर्टात याचिका केली.

६ जुलै २०१७ च्या आरबीआय परिपत्रकात काय?

  • ओटीपी शेअर केला नसतानाही झालेल्या अनधिकृत व्यवहाराची तक्रार ग्राहकाने ३ दिवसांच्या आत बँकेकडे केल्यास बँकेला फसव्या व्यवहाराची रक्कम परत करावी लागेल.  
  • बँकेने फसव्या व्यवहारांच्या ग्राहकांच्या तक्रारी ९० दिवसांच्या आत सोडवाव्यात.

बँकांनी सतर्क राहावे

  • ग्राहकाने ओटीपी शेअर केल्यामुळे व्यवहार अधिकृत होता असा दावा हायकोर्टात एसबीआयने केला. मात्र पोलिस तपासात हे व्यवहार फसवे असल्याचे स्पष्ट झाले असून यात ज्योती यांची चूक नसल्याचे म्हणत हायकोर्टाने एसबीआयला ज्योती यांना रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
  • सुप्रीम कोर्टाने हा निर्णय कायम ठेवला. फसवणूक आणि अनधिकृत व्यवहार रोखण्यासाठी बँकांनी सतर्क राहावे, असे कोर्टाने म्हटले आहे.
टॅग्स :bankबँक