शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

आजारी आईच्या औषधांसाठी बांग्लादेशी युवकानं सीमा ओलांडली; BSF जवानांनी दाखवली माणुसकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:50 IST

या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते.

ठळक मुद्देमाझी आई ह्दय आणि दमाच्या आजाराने त्रस्त आहे. तिला श्वास घेण्यास अडचण येतेतिच्यासाठी इन्हेलर आणायचं होतं. त्यासाठी त्याने भारतात प्रवेश केला.बीएसएफ जवानांनी खातरजमा करून युवकाला बांग्लादेशी सैनिकांकडे सोपवलं

सीमा सुरक्षा दलात अव्वल असणाऱ्या बीएसएफ(BSF) च्या जवानांनी माणुसकी आणि सद्भावनेचं नातं निभावल्याचं ताजं उदाहरण पाहायला मिळालं आहे. सीमा सुरक्षा दलाने २८ सप्टेंबर रोजी दुपारी महाखोला बटालियनच्या नदिया जिल्ह्यातील सीमावर्ती भागात जवानांनी एका बांग्लादेशी युवकाला बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून भारतात प्रवेश करताना पकडलं आहे. परंतु तपासावेळी हा युवक आईच्या औषधांसाठी बांग्लादेशची सीमा ओलांडल्याची माहिती समोर आली. त्यानंतर BSF नं बीजीबी(बोर्डर गार्ड बांग्लादेश) ला हा युवक सोपवला.

या युवकाचं नाव मिथुन मंडल असं आहे तो ३० वर्षाचा आहे. त्याच्या वडिलांचे नाव अरब मंडल आहे. जे चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावात राहायला होते. बीएसएफ जवानांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला की, त्याची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी इन्हेलर खरेदी करण्यासाठी त्याने बोर्डर पार करून भारतात प्रवेश केला. अटक झाल्यानंतर मिथुन मंडलने हात जोडून माफी मागत सांगितले की, माझी आई ह्दय आणि दमाच्या आजाराने त्रस्त आहे. तिला श्वास घेण्यास अडचण येते. तिच्यासाठी इन्हेलर आणायचं होतं. त्यासाठी त्याने भारतात प्रवेश केला.

बांग्लादेशी युवकाच्या अटकेनंतर बीएसएफ जवानांनी माणुसकी दाखवत त्याला बांग्लादेशी सैन्याच्या ताब्यात दिलं. हा परिसर बांग्लादेश आणि भारत सीमेवर लागून आहे. या परिसरातून अनेकदा घुसखोरीचा त्रास भारताला सहन करावा लागतो. त्यामुळे इथं प्रत्येक दिवशी कित्येक घुसखोरांना अटक करतात. अलीकडेच बोर्डर सिक्युरिटी फोर्सनं या परिसरात गस्त वाढवली आहे. बीएसएफचे जवान वारंवार सीमेवर करडी नजर ठेऊन असतात.

सीमेवर तैनात BSF चे जवान

सीमेजवळीस मुख्यालयातील दक्षिण बंगालचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की, भारत-बांग्लादेश सीमेवरून घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफ जवान कठोर पाऊलं उचलत आहे. ज्यामुळे घुसखोरी करणाऱ्यांना चाप बसला आहे. त्यातील काही घुसखोरांना कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर काही बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या गुन्ह्याची गंभीरता पाहून माणुसकीच्या नात्याने दोन्ही देशांचे सुरक्षा दल एकमेकांशी संवाद साधून सैन्याच्या ताब्यात दिलं जातं.

 

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशBSFसीमा सुरक्षा दल