शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

आईची औषधं आणण्यासाठी बांगलादेशी तरुणानं भारतीय हद्दीत प्रवेश केला; BSF नं पकडलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 17:36 IST

भारताच्या सीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे.

भारताच्यासीमा सुरक्षा दलानं (BSF) पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवत शेजारील देशासोबतच्या द्विपक्षीय संबंधांच्या नियमांचं पालन केलं आहे. बीएसएफच्या जवानांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी महाखोला येथील नदिया जिल्ह्यात सीमावर्ती परिसरात एका बांगलादेशी तरुणाला अवैध पद्धतीनं भारतीय हद्दीत प्रवेश करताना पकडलं होतं. पण चौकशी दरम्यान त्यानं आपल्या आईची औषधं आणण्यासाठी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचं जवानांना लक्षात आलं. त्यानंतर भारतीय जवानांनी संबंधित तरुणावर कोणतीही कारवाई न करता त्याला बांगलादेश गार्ड बॉर्डरच्या (BGB) जवानांकडे सोपवलं आणि मानवतेचं दर्शन घडवलं. 

संबंधित तरुणाचं नाव मिथुन मंडल असल्याची माहिती समोर आली असून तो ३० वर्षांचा आहे. त्याच्या वडिलांचं नाव अरब मंडल असं आहे. बांगलादेशातील चुआडांगा जिल्ह्यातील मझपाडा गावातील रहिवासी आहे. बीएसएफ जवानांनी तरुणाची चौकशी केली असता त्यानं आपली आई आजारी असून तो सीमेपलिकडे इन्हेलर खरेदी करण्यसाठी आला होता असं सांगितलं. 

आईला अस्थमा आणि हृदय विकाराचा त्रासमिथुन मंडल यानं अटक झाल्यानंतर भारतीय जवानांची हात जोडून माफी मागितली आणि आपल्या आईला अस्थमा आणि हृदयविकाराचा त्रास असल्याचं सांगितलं. आईला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे आईसाठी इन्हेलर घेण्यासाठी त्यानं सीमा ओलांडली होती. भारतीय जवानांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून या तरुणाला बांगलादेश जवानांकडे सोपविण्यात आलं. 

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलBangladeshबांगलादेशIndiaभारत