शहरं
Join us  
Trending Stories
1
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
2
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
3
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
4
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
5
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
6
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
7
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
8
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
9
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
10
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
11
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
12
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
13
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
14
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
15
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
16
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!
17
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
18
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
19
Chenab Railway Bridge: आयफेल टॉवरपेक्षाही उंच! मोदींच्या हस्ते चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन
20
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

बीएसएफच्या जवानाचं अपहरण करण्याचा बांगलादेशी नागरिकांकडून प्रयत्न, ओढत नेलं बांगलादेशात, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:07 IST

India-Bangladesh Relation: गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशाच्या काही नागरिकांनी बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करून त्याला बांगलादेशच्या सीमेमध्ये नेले. मात्र काही वेळाने या जवानाची सुटका करण्यात आली. पण या प्रकारामुळे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील वातावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बांगलादेशच्या सीमेवरून काही ग्रामस्थांनी बीएसएफच्या एका जवानाला बळजबरीने बांगलादेशच्या सीमेमध्ये नेल्याची आणि तिथे बांधून ठेवल्याची माहिती बीएसएफला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी माल्दा सीमेच्या दिशेने रवाना झाले. बांगलादेशमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या जवाना ओढत बांगलादेशमध्ये नेले होते, अशी माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली.

ही घटना सुइटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदनी चौक बॉर्डर आऊटपोस्टजवळ घडली. येथे बीएसएफच्या ७१ व्या बटालियनचे जवान श्री गणेश सीमेवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून तपासणी करत होते. सुरुवातीला श्री गणेश हे घुसखोरांचा पाठलाग करत चुकून बांगलादेशच्या सीमेमध्ये गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र ते भारताच्या हद्दीतच होते. तसेच त्यांना जबरदस्तीने बांगलादेशमध्ये खेचून नेण्यात आले, अशी माहिती नंतर समोर आली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश