शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

बीएसएफच्या जवानाचं अपहरण करण्याचा बांगलादेशी नागरिकांकडून प्रयत्न, ओढत नेलं बांगलादेशात, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:07 IST

India-Bangladesh Relation: गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गतवर्षी झालेल्या सत्तांतरानंतर भारत आणि बांगलादेशमधील संबंध मोठ्या प्रमाणावर बिघडले आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे सीमा संरक्षण दलाच्या (बीएसएफ) एका जवानाचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बांगलादेशाच्या काही नागरिकांनी बीएसएफच्या एका जवानाचं अपहरण करून त्याला बांगलादेशच्या सीमेमध्ये नेले. मात्र काही वेळाने या जवानाची सुटका करण्यात आली. पण या प्रकारामुळे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवरील वातावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बांगलादेशच्या सीमेवरून काही ग्रामस्थांनी बीएसएफच्या एका जवानाला बळजबरीने बांगलादेशच्या सीमेमध्ये नेल्याची आणि तिथे बांधून ठेवल्याची माहिती बीएसएफला मिळाली. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी माल्दा सीमेच्या दिशेने रवाना झाले. बांगलादेशमधील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी या जवाना ओढत बांगलादेशमध्ये नेले होते, अशी माहिती बीएसएफमधील सूत्रांनी दिली.

ही घटना सुइटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदनी चौक बॉर्डर आऊटपोस्टजवळ घडली. येथे बीएसएफच्या ७१ व्या बटालियनचे जवान श्री गणेश सीमेवर संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवून तपासणी करत होते. सुरुवातीला श्री गणेश हे घुसखोरांचा पाठलाग करत चुकून बांगलादेशच्या सीमेमध्ये गेले होते, असे सांगण्यात आले. मात्र ते भारताच्या हद्दीतच होते. तसेच त्यांना जबरदस्तीने बांगलादेशमध्ये खेचून नेण्यात आले, अशी माहिती नंतर समोर आली.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलIndiaभारतBangladeshबांगलादेश