शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 11:09 IST

Bangladeshi Refugees News: देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्या या बांगलादेशींना माघारी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष अभियानही चालवले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शेजारील बांगलादेशमधून येणाऱ्या विस्थापितांना आश्रय देण्याबाबत मिझोरामची भूमिका समजून घेण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मिझोरामच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, २०२२ पासून बांगलादेशमधून सुमारे २ हजार जो जमतीच्या लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोहत झालेल्या एका बैठकीमध्ये मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मदींना सांगितले की, मिझोराम सरकार बांगलादेशमधील जो जमातीच्या लोकांना माघारी धाडू शकत नाही. तसेच त्यांना निर्वासित करू शकत नाही.

लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, मिझो जमातीमधील एक असलेल्या बावम जमातीचे अनेक लोक बांगलादेशमधून २०२२ पासून मिझोराममध्ये आश्रय घेत आहेत. त्यातील अनेकजण अजूनही राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये बांगलादेशी लष्कराने कुकी-चिन नॅशनल आर्मीविरोधात कारवाई केल्यानंतर बावम जमातीचे लोक मिझोराममध्ये प्रवेश करू लागले होते.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी