शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 11:09 IST

Bangladeshi Refugees News: देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्या या बांगलादेशींना माघारी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष अभियानही चालवले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शेजारील बांगलादेशमधून येणाऱ्या विस्थापितांना आश्रय देण्याबाबत मिझोरामची भूमिका समजून घेण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मिझोरामच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, २०२२ पासून बांगलादेशमधून सुमारे २ हजार जो जमतीच्या लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोहत झालेल्या एका बैठकीमध्ये मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मदींना सांगितले की, मिझोराम सरकार बांगलादेशमधील जो जमातीच्या लोकांना माघारी धाडू शकत नाही. तसेच त्यांना निर्वासित करू शकत नाही.

लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, मिझो जमातीमधील एक असलेल्या बावम जमातीचे अनेक लोक बांगलादेशमधून २०२२ पासून मिझोराममध्ये आश्रय घेत आहेत. त्यातील अनेकजण अजूनही राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये बांगलादेशी लष्कराने कुकी-चिन नॅशनल आर्मीविरोधात कारवाई केल्यानंतर बावम जमातीचे लोक मिझोराममध्ये प्रवेश करू लागले होते.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी