शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 11:09 IST

Bangladeshi Refugees News: देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

देशाच्या विविध भागात वास्तव्यास असलेले बांगलादेशी घुसखोर ही एक गंभीर समस्या बनलेली आहे. बेकायदेशीरपणे देशात राहणाऱ्या या बांगलादेशींना माघारी पाठवण्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विशेष अभियानही चालवले जात आहे. बांगलादेशी घुसखोरांच्या विषयावरून मोठ्या प्रमाणावर राजकारणही होत असतं. दरम्यान, ईशान्य भारतातील मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशी घुसखोरांबाबत मांडलेली भूमिका ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी शेजारील बांगलादेशमधून येणाऱ्या विस्थापितांना आश्रय देण्याबाबत मिझोरामची भूमिका समजून घेण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मिझोरामच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, २०२२ पासून बांगलादेशमधून सुमारे २ हजार जो जमतीच्या लोकांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे, अशी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. तसेच नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोहत झालेल्या एका बैठकीमध्ये मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मदींना सांगितले की, मिझोराम सरकार बांगलादेशमधील जो जमातीच्या लोकांना माघारी धाडू शकत नाही. तसेच त्यांना निर्वासित करू शकत नाही.

लालदुहोमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले की, मिझो जमातीमधील एक असलेल्या बावम जमातीचे अनेक लोक बांगलादेशमधून २०२२ पासून मिझोराममध्ये आश्रय घेत आहेत. त्यातील अनेकजण अजूनही राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये बांगलादेशी लष्कराने कुकी-चिन नॅशनल आर्मीविरोधात कारवाई केल्यानंतर बावम जमातीचे लोक मिझोराममध्ये प्रवेश करू लागले होते.  

टॅग्स :IndiaभारतBangladeshबांगलादेशCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी