शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 23:29 IST

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी भारत-बांग्लादेश संबंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचार, द्विपक्षीय करार आणि तेथील राजकीय परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की,बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या घटनांना दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती असल्याचे म्हटले असून भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, बैठकीत बहुतेक सदस्यांनी कोणत्याही पक्षाची पर्वा न करता शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्याबद्दल विचारपूस केली.

बैठकीत उपस्थित खासदारांनी अनेक प्रश्न विचारले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील राहणीमानावर होता. मात्र, परराष्ट्र सचिवांनी यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. समितीचे खासदार बांगलादेशला भेट देऊ शकतात, असेही शशी थरूर यांनी सुचवले. याशिवाय, भूतानला भेट देण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. भारत आणि बांगलादेशमधील सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक संपत्तीवरील हल्ल्यांबाबत भारताच्या चिंतेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसिम उद्दीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल आणि कल्याणाबाबत भारताने चिंता व्यक्त केल्याचे विक्रम मिश्री यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत भारताने सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत आपले आक्षेप नोंदवले होते. बांगलादेश प्रशासन या मुद्द्यांवर विधायक दृष्टिकोन स्वीकारेल आणि दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेतील, अशी आशा विक्रम मिश्री यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतShashi Tharoorशशी थरूर