शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 23:29 IST

बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी भारत-बांग्लादेश संबंधांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील हिंसाचार, द्विपक्षीय करार आणि तेथील राजकीय परिस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले की, परराष्ट्र सचिव अलीकडेच बांगलादेशला गेले होते, जेणेकरून ते समितीला ताजी माहिती सांगू शकतील.

परराष्ट्र सचिवांनी सांगितले की,बांगलादेशने अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, बांगलादेश सरकारने या घटनांना दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती असल्याचे म्हटले असून भारताने आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन केले आहे. तसेच, परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, बैठकीत बहुतेक सदस्यांनी कोणत्याही पक्षाची पर्वा न करता शेख हसीना यांच्या भारतातील वास्तव्याबद्दल विचारपूस केली.

बैठकीत उपस्थित खासदारांनी अनेक प्रश्न विचारले, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतातील राहणीमानावर होता. मात्र, परराष्ट्र सचिवांनी यावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. समितीचे खासदार बांगलादेशला भेट देऊ शकतात, असेही शशी थरूर यांनी सुचवले. याशिवाय, भूतानला भेट देण्याच्या शक्यतेवरही चर्चा झाली. भारत आणि बांगलादेशमधील सांस्कृतिक, धार्मिक आणि राजनैतिक संपत्तीवरील हल्ल्यांबाबत भारताच्या चिंतेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

भारत आणि बांगलादेशच्या परराष्ट्र सचिवांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतही हे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. बांगलादेशचे परराष्ट्र सचिव मोहम्मद जसिम उद्दीन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबद्दल आणि कल्याणाबाबत भारताने चिंता व्यक्त केल्याचे विक्रम मिश्री यांनी सांगितले. तसेच, या बैठकीत भारताने सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांवरील हल्ल्यांच्या घटनांबाबत आपले आक्षेप नोंदवले होते. बांगलादेश प्रशासन या मुद्द्यांवर विधायक दृष्टिकोन स्वीकारेल आणि दोन्ही देशांमधील संबंध सकारात्मक दिशेने पुढे नेतील, अशी आशा विक्रम मिश्री यांनी व्यक्त केली.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतShashi Tharoorशशी थरूर