शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:24 IST

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत.

ढाका - बांगलादेशातील युनूस सरकारच्या नव्या निर्णयानं भारताचं टेन्शन वाढलं आहे. बांगलादेशातपाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधावर काही सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांची सुरक्षा मंजुरी संपल्याने बांगलादेशच्या जमिनीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चे एजेंट सहजपणे पोहचू शकतात. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हे संबंध थेट भारतीय सुरक्षेवर दिसून येतील अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अजय रैना सांगतात की, बांगलादेशातील सत्ता परिवर्तन पाकिस्तानच्या ISI च्या माध्यमातून केल्याचं समोर आले आहे. मागील पंतप्रधानांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मुक्तपणे फिरता येऊ शकते त्याशिवाय सत्ताधारी प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप होताना दिसत आहे. जर सर्वकाही बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि पाकिस्तानच्या योजनेनुसार झाले तर लवकरच बांगलादेश व्यावहारिकरित्या पूर्वीसारखा पाकिस्तान बनेल असं त्यांनी सांगितले.

बांगलादेशात सध्या कट्टरपंथी सक्रीय होत आहेत. बांगलादेशातील अंबरखाना इथं पाकिस्तान समर्थित आघाडी एकजूट झाल्याची बातमी आहे. याठिकाणाहून कथितपणे भारताच्या पूर्वोत्तर राज्यात घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. भारतात आसाम मेघालय सीमेवर वाढत्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. नव्या सत्तेत बांगलादेश प्रशासनात वैचारिक बदल सेक्युलर आणि लोकशाही मुल्यांना धोका देणारे ठरलेत.

भारतासाठी धोक्याची घंटा का?

पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाच्या निर्बंधातून काही दिलासा देणे भारतासाठी दुहेरी धोका आहे. त्यामुळे ना केवळ इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील गुप्तचर यंत्रणा एकमेकांना फायदा होणार तर त्यामागचा मुख्य उद्देश भारताला अस्थिर करण्याचा आहे. पूर्वोत्तर राज्यात विशेषत: आसाममध्ये अशांतता निर्माण करून घुसखोरी आणि कट्टरपंथी कारवायांसाठी हॉटस्पॉट बनवलं जाऊ शकते. बांगलादेशात होणाऱ्या बदलांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नजर ठेवून आहेत. सीमेवर जवानही अलर्टवर आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारतासाठी एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतPakistanपाकिस्तान