शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:24 IST

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत.

ढाका - बांगलादेशातील युनूस सरकारच्या नव्या निर्णयानं भारताचं टेन्शन वाढलं आहे. बांगलादेशातपाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधावर काही सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांची सुरक्षा मंजुरी संपल्याने बांगलादेशच्या जमिनीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चे एजेंट सहजपणे पोहचू शकतात. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हे संबंध थेट भारतीय सुरक्षेवर दिसून येतील अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अजय रैना सांगतात की, बांगलादेशातील सत्ता परिवर्तन पाकिस्तानच्या ISI च्या माध्यमातून केल्याचं समोर आले आहे. मागील पंतप्रधानांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मुक्तपणे फिरता येऊ शकते त्याशिवाय सत्ताधारी प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप होताना दिसत आहे. जर सर्वकाही बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि पाकिस्तानच्या योजनेनुसार झाले तर लवकरच बांगलादेश व्यावहारिकरित्या पूर्वीसारखा पाकिस्तान बनेल असं त्यांनी सांगितले.

बांगलादेशात सध्या कट्टरपंथी सक्रीय होत आहेत. बांगलादेशातील अंबरखाना इथं पाकिस्तान समर्थित आघाडी एकजूट झाल्याची बातमी आहे. याठिकाणाहून कथितपणे भारताच्या पूर्वोत्तर राज्यात घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. भारतात आसाम मेघालय सीमेवर वाढत्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. नव्या सत्तेत बांगलादेश प्रशासनात वैचारिक बदल सेक्युलर आणि लोकशाही मुल्यांना धोका देणारे ठरलेत.

भारतासाठी धोक्याची घंटा का?

पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाच्या निर्बंधातून काही दिलासा देणे भारतासाठी दुहेरी धोका आहे. त्यामुळे ना केवळ इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील गुप्तचर यंत्रणा एकमेकांना फायदा होणार तर त्यामागचा मुख्य उद्देश भारताला अस्थिर करण्याचा आहे. पूर्वोत्तर राज्यात विशेषत: आसाममध्ये अशांतता निर्माण करून घुसखोरी आणि कट्टरपंथी कारवायांसाठी हॉटस्पॉट बनवलं जाऊ शकते. बांगलादेशात होणाऱ्या बदलांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नजर ठेवून आहेत. सीमेवर जवानही अलर्टवर आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारतासाठी एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतPakistanपाकिस्तान