शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

युनूस सरकारच्या 'या' खेळीनं बांगलादेशात पाकिस्तानी ISI ची एन्ट्री?; भारतासाठी टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 14:24 IST

बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत.

ढाका - बांगलादेशातील युनूस सरकारच्या नव्या निर्णयानं भारताचं टेन्शन वाढलं आहे. बांगलादेशातपाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा निर्बंधावर काही सूट देण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांची सुरक्षा मंजुरी संपल्याने बांगलादेशच्या जमिनीवर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI चे एजेंट सहजपणे पोहचू शकतात. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील हे संबंध थेट भारतीय सुरक्षेवर दिसून येतील अशी भीती काही तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

संरक्षण तज्ज्ञ आणि निवृत्त कर्नल अजय रैना सांगतात की, बांगलादेशातील सत्ता परिवर्तन पाकिस्तानच्या ISI च्या माध्यमातून केल्याचं समोर आले आहे. मागील पंतप्रधानांकडून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना मुक्तपणे फिरता येऊ शकते त्याशिवाय सत्ताधारी प्रक्रियेत त्यांचा हस्तक्षेप होताना दिसत आहे. जर सर्वकाही बांगलादेशातील अंतरिम सरकार आणि पाकिस्तानच्या योजनेनुसार झाले तर लवकरच बांगलादेश व्यावहारिकरित्या पूर्वीसारखा पाकिस्तान बनेल असं त्यांनी सांगितले.

बांगलादेशात सध्या कट्टरपंथी सक्रीय होत आहेत. बांगलादेशातील अंबरखाना इथं पाकिस्तान समर्थित आघाडी एकजूट झाल्याची बातमी आहे. याठिकाणाहून कथितपणे भारताच्या पूर्वोत्तर राज्यात घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. भारतात आसाम मेघालय सीमेवर वाढत्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. बांगलादेशातील प्रशासनातही बदल झाल्याचे दिसते. हिंदू आणि आवामी लीगच्या अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जमातीशी निगडीत अधिकारी प्रशासनात आणले गेलेत. नव्या सत्तेत बांगलादेश प्रशासनात वैचारिक बदल सेक्युलर आणि लोकशाही मुल्यांना धोका देणारे ठरलेत.

भारतासाठी धोक्याची घंटा का?

पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाच्या निर्बंधातून काही दिलासा देणे भारतासाठी दुहेरी धोका आहे. त्यामुळे ना केवळ इस्लामाबाद आणि ढाका यांच्यातील गुप्तचर यंत्रणा एकमेकांना फायदा होणार तर त्यामागचा मुख्य उद्देश भारताला अस्थिर करण्याचा आहे. पूर्वोत्तर राज्यात विशेषत: आसाममध्ये अशांतता निर्माण करून घुसखोरी आणि कट्टरपंथी कारवायांसाठी हॉटस्पॉट बनवलं जाऊ शकते. बांगलादेशात होणाऱ्या बदलांवर भारतीय सुरक्षा यंत्रणा नजर ठेवून आहेत. सीमेवर जवानही अलर्टवर आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध भारतासाठी एक मोठं आव्हान निर्माण करू शकतात. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतPakistanपाकिस्तान