बंगलोर- एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली
By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30
९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमी

बंगलोर- एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस रुळावरून घसरली
९ प्रवासी ठार, १६ गंभीर जखमीअनेकल(कर्नाटक)- कर्नाटक- तामिळनाडू सीमेवर अनेकल येथे शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता रुळावर दरड कोसळल्यामुळे बंगलोर- एर्नाकुलम इंटर सिटी एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरून झालेल्या भीषण अपघातात ९ प्रवासी ठार तर १६ जखमी झाले. सकाळी ७.३० वाजता बेंगळुरूपासून ४५ किमी अंतरावरील अनेकल आणि होसुल दरम्यान रेल्वेमार्गावर हा अपघात झाला. बंगलोर-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेस सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी बेंगळुरूवरून रवाना झाली होती.घटनास्थळी हजर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिलकुमार अग्रवाल यांनी पत्रकारांना या अपघाताची माहिती देताना सांगितले की, मदत कार्य पूर्ण होईपर्यंत मृतांचा आकडा नऊवर पोहोचला होता. मृतांमध्ये पाच पुरुष, तीन महिला आणि नऊ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनेनंतर लगेच केलेल्या टिष्ट्वटमध्ये रुळावर एक मोठा दगड पडला होता. इंटरसिटी एक्स्प्रेस त्यावर धडकल्याने हा अपघात घडल्याचे म्हटले आहे. आपण एका मोठ्या दगडाचा आवाज ऐकल्याचे गाडीचालकाने अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु असा कुठलाही दगड मिळालेला नाही,असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. अपघातात जखमी १६ प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती कर्नाटकचे पोलीस महासंचालक लालरोखुमा पचाऊ यांनी दिली. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. रेल्वे, पोलीस, अग्निशामक विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातर्फे संयुक्तपणे बचाव कार्य सुरूअसून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. केंद्रीय विधी मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा तातडीने अपघातस्थळी पोहचले होते. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यू.टी. खादर यांच्या सांगण्यानुसार या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती त्यांना प्रशासनाकडून मिळाली आहे. रेल्वेमंत्री अपघातस्थळी,चौकशीचे आदेशदरम्यान अपघातस्थळी पोहोचलेले रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी या अपघाताची जबाबदारी निश्चित करण्याचे तसेच भविष्यात अशाप्रकारच्या अपघातांवर आळा घालण्याच्या दृष्टीने सुरक्षात्मक उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांनी अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये तर किरकोळ जखमींना २०,००० रुपये आर्थिक मदत जाहीर केली. पंतप्रधानांचा दुखवटापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भीषण रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांबद्दल दुखवटा व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. (वृत्तसंस्था)