शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बालासोर अपघात: देवदूतासारखी स्थानिकांनी घेतली धाव अन् वाचले शेकडो प्रवाशांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:18 IST

अंधारात शर्थ करून जखमींना काढले बाहेर, मिळेल त्या वाहनाने पाठविले रुग्णालयात

बालासोर : सूर्य मावळल्यानंतर सर्वत्र झालेला अंधार. अचानक कानठळ्या बसतील एवढा माेठ्ठा आवाज हाेताे आणि लाेकांचे किंचाळणे ऐकू येते. बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ काेराेमंडल एक्स्प्रेस मालगाडीला धडकली हाेती. तर आणखी एका गाडीचे डबे रुळावरून घसरले. एका क्षणात शेकडाे जीव गेले. अशा बिकटप्रसंगी जवळपास राहणाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून देवदूताप्रमाणे घटनास्थळी धाव घेतली.  अनेक प्रवाशांना अपघातग्रस्त डब्यांमधून बाहेर काढले आणि मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात पाठविण्यात आले.

गिरी नावाच्या तरुणाने सांगितले की, अंधार असल्यामुळे मदत करणे कठीण हाेते. बचावलेले लाेक त्यांच्या आप्तेष्टांना शाेधत हाेते. अनेक जणांचे माेबाइल हरविले हाेते. त्यामुळे आम्ही आमच्या फाेनवरून लाेकांचे नातेवाइकांशी बाेलणे करून दिले. लहान मुले रडत हाेती. त्यांच्या आई-वडिलांचा शाेध लागत नव्हता. अनेक मृतदेहांचे तुकडे झाल्यामुळे ते गोळा करताना लोकांचा आक्राेश ऐकू येत हाेता. (वृत्तसंस्था)

प्रत्येक जण घाबरलेला हाेता

डब्यात अडकलेली मुले व महिला यांना बाहेर काढण्यासाठी शिड्यांचा आधार घ्यावा लागला. अनेकांचे मृतदेह बाहेर काढले. वाचलेल्या लाेकांना आम्ही पाणी दिले. प्रत्येक जण घाबरलेला हाेता. काेणाला काहीच कळत नव्हते. बचाव पथक व इतर अधिकारी आल्यानंतर आणखी लाेकांना बाहेर काढण्यात आले.

एका रात्रीत जमा झाले ५०० युनिट रक्त 

भीषण रेल्वे अपघातानंतर मानवतेचे उदाहरण देणारी काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यात जखमींना रक्तदान करण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्थानिक लोकांच्या लांबच लांब रांगा दिसतात. जखमींसाठी अचानक रक्ताची मागणी वाढणार हे ओळखून स्थानिक लोक रात्रीच मदतीसाठी धावले. रक्तदान करण्यासाठी लोक स्वत:हून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. बालासोरमध्ये तर एका रात्रीत ५०० युनिट रक्त जमा झाल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, रात्रीतूनच रक्तदानासाठी लोकांची मोठी रांग लागली. काही दाेन तास उभे होते, तर काही चार तास उभे होते. जखमींना मदत करण्यासाठी रात्री बालासोर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाेन हजाराहून अधिक लोक जमले आणि अनेकांनी रक्तदानही केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘कवच’ असते तर टाळता आला असता रेल्वे अपघात!

शुक्रवारी संध्याकाळी ज्या रेल्वे मार्गावर भीषण अपघात झाला त्या मार्गावर ‘कवच’ उपलब्ध नव्हते, असे रेल्वेने सांगितले. ‘कवच’ म्हणजे काय? धावत्या रेल्वे गाड्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘कवच’ नावाची स्वतःची स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली विकसित केली आहे. कवच हे तीन भारतीय व्हेंडर्सच्या सहकार्याने रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशनने (आरएसडीओ) स्वदेशी पद्धतीने विकसित केले आहे.

ही यंत्रणा लोको पायलटला धोक्याच्या क्षणी आणि अतिवेगात सिग्नल जंप करण्यापासून दूर ठेवण्यासोबतच दाट धुक्यासारख्या प्रतिकूल हवामानातही ट्रेन सुरळीत धावण्यास मदत करते. कवच एकूणच ट्रेनची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवते.

असे आहे ‘कवच’

लोको पायलट ब्रेक लावू न शकल्यास ऑटोमॅटिक ब्रेकद्वारे ट्रेनचा वेग नियंत्रित होतो. ही यंत्रणा ट्रेनच्या गतीवर, हालचालीवर सतत लक्ष ठेवते आणि त्याचे सिग्नल पाठवत राहते. कोणतीही दुर्घटना घडल्यास जवळपासच्या ट्रेनवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘एसओएस’चे फीचर थेट लोको ते लोको संवादाद्वारे टक्कर टाळणे. लेव्हल-क्रॉसिंग गेट्सवर आपोआप शिट्टी वाजणे. दक्षिण मध्य रेल्वेच्या लिंगमपल्ली-विकराबाद-वाडी आणि विकाराबाद-बिदर सेक्शनवर २५० किलोमीटर अंतरावर चाचण्या झाल्या.  नवी दिल्ली-हावडा आणि नवी दिल्ली-मुंबई विभागांवर मार्च २०२४ पर्यंत कार्यान्वित करण्याचे लक्ष्य आहे.

मनोरंजन विश्वही हळहळले

- ओडिशामधील भीषण रेल्वे अपघातामुळे अनेकांचा थरकाप उडाला. अपघाताची भीषणता पाहुन लोकांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. 

- जवळपास सर्वच स्तरांतील लोकांनी सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले.  

- सलमान खान, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, परिणिती चोप्रा, काजोल, करिना कपूर यांच्यासह ज्युनियर एनटीआर, चिरंजीवी अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. 

- चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही दुःख व्यक्त करतानाच एकाचवेळी तीन ट्रेनचा अपघात कसा काय होऊ शकतो? याला कोण जबाबदार? असा सवाल विचारत संतापही व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे डाेळे पाणावले

बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या बातमीने दुःख झाले. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, ही सदिच्छा. -  राहुल गांधी, काँग्रेस नेते.

बालासोर रेल्वे दुर्घटनेतील २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. - नितीश कुमार, मुख्यमंत्री, बिहार.

अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी रात्रभर अविश्रांत काम करणाऱ्या स्थानिकांसह बचाव पथकाचे मनापासून आभार. - नवीन पटनायक, मुख्यमंत्री, ओडिशा.

बालासोर रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. तमिळनाडू सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. - एम. के. स्टॅलिन, मुख्यमंत्री, तामिळनाडू.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता रेल्वे अपघात होणार नाही, अशी घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली होती. ही यंत्रणा रेल्वे बसवली होती का? असेल तर ती कार्यरत का नव्हती? याचा तपास व्हायला हवा. - फारूख अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातIndian Railwayभारतीय रेल्वे