शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:27 IST

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर राजकारण सुरू झाले आहे. यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका केली. या अपघाताची उच्चस्तरीय चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘राजद’नेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘कवच’मध्येही काही झाले का? असा सवाल करून सरकारसाठी केवळ ‘वंदे भारत’मध्ये प्रवास करणारीच माणसे आहेत, अशी टीका केली. 

सुरक्षेकडे दुर्लक्ष : तृणमूलचा आराेप 

तृणमूल काॅंंग्रेसने रेल्वे अपघातावरून केंद्र सरकारवर टीका करतानाच प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात रेल्वेगाड्यांमध्ये टक्करविराेधी उपकरण लावण्याचा निर्णय घेतला हाेता. ती आतापर्यंत लागलेले नाहीत.

तिकिटांचे दर वाढवाल तर खबरदार!

रेल्वे अपघातानंतर भुवनेश्वरवरून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांची अवास्तव भाडेवाढीवर लक्ष ठेवून असे प्रकार राेखण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.  अपघातामुळे तिकीट रद्द करणे किंवा प्रवासाच्या पुनर्नियाेजनासाठी काेणतेही अतिरिक्त शुल्क घ्यायला नकाे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

एकीकडे स्थानिक लोकांनी-तरुणांनी रक्तदानासाठी रात्रीच रुग्णालयांमध्ये धाव घेतली, तर दुसरीकडे खासगी बसमालकांकडून मात्र टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. अनेक ट्रेन रद्द झाल्यामुळे पश्चिम बंगालमधून 'जगन्नाथ स्नान यात्रा'साठी पुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बसचालकांनी भाडे अचानक दुप्पट किंवा तिप्पट केले. भद्रक, कटक आणि पुरीला नॉन-एसी बसमधून प्रवासासाठी साधारणतः अनुक्रमे ४००, ६०० आणि ८०० रुपये लागतात. त्याच प्रवासासाठी सुमारे १२०० ते १५०० रुपये, तर काही एजंटांनी २,००० ते २,५०० रुपयेही मागितल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात