शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बालासोर अपघात: सुरक्षेकडे दुर्लक्ष, विरोधकांचा आरोप; खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 05:27 IST

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

एस. पी. सिन्हा, लाेकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ओडिशातील भीषण रेल्वे अपघातानंतर राजकारण सुरू झाले आहे. यूपीए सरकारमध्ये रेल्वेमंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव यांनी घटनेवर दु:ख व्यक्त करताना रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर टीका केली. या अपघाताची उच्चस्तरीय चाैकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ‘राजद’नेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ‘कवच’मध्येही काही झाले का? असा सवाल करून सरकारसाठी केवळ ‘वंदे भारत’मध्ये प्रवास करणारीच माणसे आहेत, अशी टीका केली. 

सुरक्षेकडे दुर्लक्ष : तृणमूलचा आराेप 

तृणमूल काॅंंग्रेसने रेल्वे अपघातावरून केंद्र सरकारवर टीका करतानाच प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तसेच माजी रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, माझ्या कार्यकाळात रेल्वेगाड्यांमध्ये टक्करविराेधी उपकरण लावण्याचा निर्णय घेतला हाेता. ती आतापर्यंत लागलेले नाहीत.

तिकिटांचे दर वाढवाल तर खबरदार!

रेल्वे अपघातानंतर भुवनेश्वरवरून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांची अवास्तव भाडेवाढीवर लक्ष ठेवून असे प्रकार राेखण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिले आहेत.  अपघातामुळे तिकीट रद्द करणे किंवा प्रवासाच्या पुनर्नियाेजनासाठी काेणतेही अतिरिक्त शुल्क घ्यायला नकाे, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

खासगी बसमालकांकडून रेल्वे प्रवाशांची लूट

एकीकडे स्थानिक लोकांनी-तरुणांनी रक्तदानासाठी रात्रीच रुग्णालयांमध्ये धाव घेतली, तर दुसरीकडे खासगी बसमालकांकडून मात्र टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार समोर आला. अनेक ट्रेन रद्द झाल्यामुळे पश्चिम बंगालमधून 'जगन्नाथ स्नान यात्रा'साठी पुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. बसचालकांनी भाडे अचानक दुप्पट किंवा तिप्पट केले. भद्रक, कटक आणि पुरीला नॉन-एसी बसमधून प्रवासासाठी साधारणतः अनुक्रमे ४००, ६०० आणि ८०० रुपये लागतात. त्याच प्रवासासाठी सुमारे १२०० ते १५०० रुपये, तर काही एजंटांनी २,००० ते २,५०० रुपयेही मागितल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

 

टॅग्स :Odisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघात