शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नुपूर शर्मा पुन्हा चर्चेत; राम गोपाल मिश्राच्या हत्येबाबत केला दावा, नंतर मागितली माफी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 18:03 IST

Bahraich Violence Case: सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नुपूर शर्मांना माफी मागावी लागली.

Bahraich Violence Case: भारतीय जनता पक्षाच्या माजी नेत्या नुपूर शर्मा पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी बहराइच हिंसाचाराचा उल्लेख केला. यावेळी त्या म्हणाल्या की, बहराइच हिंसाचारातील पीडित राम गोपाल मिश्रा यांच्यावर 35 गोळ्या झाडल्या. त्यांची नखे ओरबाडली, पोटे फाडले आणि त्यांचे डोळेही बाहेर काढण्यात आले.

नुपूर शर्मा भाषण करत होत्या, तेव्हा मंचावर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कलराज मिश्राही उपस्थित होते. नुपूर शर्मांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. त्यांच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. याशिवाय, बहराइच पोलिसांनीही या दाव्याचे स्पष्टपणे खंडन केले. 

पोलीस काय म्हणाले?बहराइच पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले होते की, अशा अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. अशा अफवा पसरवू नका, असे निवेदन पोलिसांनी जारी केले आहे. रामगोपाल मिश्रा यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची क्रूरता झाली नाही. त्यांना फक्त गोळ्या मारण्यात आल्या.

नंतर मागितली माफी सोशल मीडियावर बराच गदारोळ झाल्यानंतर नुपूर शर्मांनी माफी मागितली. त्यांनी X वर लिहिले, “मी दिवंगत राम गोपाल मिश्रा यांच्याबद्दल सोशल मीडियावर जे ऐकले होते, तेच आपल्या भाषणात बोलले. मला पोस्टमार्टम रिपोर्टची माहिती नव्हती, त्यामुळे मी माझे शब्द परत घेते आणि माफी मागते.

टॅग्स :BJPभाजपाSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल