शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

"भारत-पाकिस्तानमध्ये पडद्यामागून चर्चा सुरू; पुढल्या महिन्यात मोदी इस्लामाबादला जाण्याची शक्यता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 10:49 IST

भारत-पाकिस्तानमध्ये पडद्यामागून चर्चा सुरू असल्याचा दावा

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचा दावा पाकिस्तानमधील अब्जाधीश उद्योगपती मियाँ मांशा यांनी केला आहे. आम्ही एकत्र येऊन काम केल्यास पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानचा दौरा करू शकतात, असंही मांशा म्हणाले. कोणतंही शत्रुत्व कायमस्वरुपी नसतं. भारतासोबत असलेले संबंध ठीक करण्याची गरज आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

पाकिस्तानातील बहुराष्ट्रीय कंपनी 'निशात समूहा'चे प्रमुख असलेल्या मियाँ मांशा यांनी दोन्ही देशांमधील व्यापाराचा संदर्भ दिला. '१९६५ च्या युद्धाआधी पाकिस्तानचा ५० टक्के व्यापार भारतासोबत व्हायचा. आमच्याकडे अशा अनेक वस्तू ज्या भारताला दिल्या जाऊ शकतात. कोणतंही शत्रुत्व कायमस्वरुपी नसतं. पाकिस्तानमध्ये गरिबी आहे. त्यामुळे आम्हाला भारतासोबतचे संबंध सुधारावे लागतील,' असं मांशा म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्ताननं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं. त्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर जोर देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मांशा यांनी केलेला दावा महत्त्वाचा मानला जात आहे. आम्ही पुढील १०० वर्षे भारतासोबत वैर ठेवणार नाही, असं काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं एक्स्प्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राला सांगितलं होतं. याबद्दल संवाद झाल्यास, तो सकारात्मक असल्यास २ देशांमधले व्यवसायिक संबंध सामान्य होतील, असंही त्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्यामागून संवाद सुरू असल्याची चर्चा याआधीही झाली होती. अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा करण्यापूर्वी भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू असल्याच्या बातम्या आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकारी त्रयस्थ देशात भेटल्याची चर्चा झाली होती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानIndiaभारत