शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध बांधली होती मशीद - शिया वक्फ बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 09:24 IST

'16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती'

ठळक मुद्दे16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होतीबाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होतीइरानच्या मौलवींनीही हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे यासाठी समर्थन दिलं आहे

नवी दिल्ली, दि. 22 - अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा करणा-या शिया वक्फ बोर्डाने अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. शिया बोर्डाने सोमवारी न्यायालयात सांगितलं की, 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती, आणि येथूनच हिंदू - मुस्लिम वादाला सुरुवात झाली. बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मीर बाकी हा बाबरच्या लष्कराचा सेनापती होता. तो शिया होता आणि त्याने हिंदूच्या भावनांविरोधात जात मुघल लष्कराचा वापर केला. 1528-29 दरम्यान त्याने मंदिरांच्या मधोमध मशीद उभारली. हा वादा सुरु करण्याचं काम त्यानेच केलं आहे'.   

याआधीही शिया वक्फ बोर्डाने न्यायालयात माहिती देताना सांगितलं होतं की, अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 30 मार्च 1946 रोजी ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिलं आहे, ज्यामध्ये मशिदीला सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिया वक्फ बोर्डाने सांगितलं आहे की, 'बाबरी मशीद बांधण्यासाठी त्याठिकाणी असलेलं मंदिर नष्ट करण्यात आलं होतं'. 

वसीम रिझवी यांनी सांगितलं आहे की, 'शिया वक्फ बोर्डाने सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला असून, वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या परिसरात मशीद उभारली जाऊ शकते'. मशिदीला बाबर किंवा मीर बाकीचं नाव देण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 'सर्व वाद संपतील असं नाव मशिदीला द्दयायचं आहे. नव्या मशिदीचं नाव मस्जिद-ए-अमन असं ठेवण्यात येईल, जे शांततेचा संदेश देण्याचं काम करेल'. 

इरानच्या मौलवींनीही हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे यासाठी समर्थन दिलं आहे. यासंबंधी कोणताही वाद होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मीर बाकी याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद होऊ फूट पडली. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असं रिझवी बोलले आहेत. 'आज तिथे मशीद नाही आहे. पण दहशतवाद पसरवण्यासाठी परदेशातून येणारा पैसा जमा करणारे काही मुस्लिम धर्मगुरु इस्लामचं नाव खराब करत आहेत', अशी खंत रिझवी यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय