शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

येडियुरप्पा सरकारचा यूटर्न, चौकशीनंतरच हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 16:29 IST

'मृतांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता'

मंगळुरू : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. कर्नाटकातही या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. येथील मंगळुरुमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण आले आणि यात दोघांचा मृत्यू झाला होता. या मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची घोषणा राज्यातील येडियुरप्पा सरकारने केली होती. मात्र, आता सरकारने यूटर्न घेतला असून या घटनेची चौकशी झाल्यानंतरच मृतांच्या कुटुंबीयांना मदत करायची की नाही, यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.  

हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या घटनेची राज्य सरकारकडून सीआयडी आणि न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना मदत करण्याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले. 

मंगलुरुमध्ये 19 डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतांच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता. मात्र, पोलिसांनी हा आरोप फेटाळला होता. 

दरम्यान, या घटनेनंतर 22 डिसेंबरला मंगळुरु दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी विविध धार्मिक समाजाच्या प्रतिनिधीसोबत आणि पीडित कुटुंबीयांसोबत चर्चा केली. त्यावेळी आंदोलनातील त्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच, आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी सांगितले होते.  

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटक