शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
3
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
4
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
5
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
6
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
7
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
8
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
9
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
10
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
11
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
12
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
13
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
14
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
15
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
16
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
17
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
18
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
19
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
20
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
Daily Top 2Weekly Top 5

'आयुष्यमान भारत म्हणजे जनतेचा पैसा खासगी हातांमध्ये देण्याचा अधिकृत मार्ग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 13:03 IST

एम्सच्या कार्यक्रमात डॉक्टरांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली: आयुष्यमान योजनेच्या नियोजन आणि क्षमतेवर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी, एम्समधील डॉक्टरांची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयुष्यमान भारत योजना म्हणजे जनतेला पैसा खासगी क्षेत्राला देण्याचा अधिकृत मार्ग असल्याचा सूर नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उमटला. एम्समध्ये 'आयुष्यमान भारत: तथ्यं आणि कल्पना' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा सुधारायला हव्यात, अशी गरज यामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी व्यक्त केली. आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असल्याचं वर्णन जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या सामाजिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक डॉ. विकास बाजपेयी यांनी केलं. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसारख्या सरकारी योजना का अपयशी ठरल्या, याचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 'याआधीही सरकारकडून आरोग्य क्षेत्रासाठी योजना राबवण्यात आल्या. त्यातील त्रुटींचा अभ्यास केला असता, तर अधिक चांगलं झालं असतं. आधी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळता आली असती,' असं मत त्यांनी व्यक्त केलं.  लोकांच्या, त्यातही गरिबांच्या आजारपणाचं नेमकं कारण काय, या मुद्द्याचा आयुष्यमान भारत योजनेत विचारच करण्यात आलेला नाही, असं बाजपेयी म्हणाले. आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा खासगी क्षेत्राच्या हाती जाणारं एक माध्यम असल्याचा दावा त्यांनी केला. एम्समधील जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या सुब्रतो सिन्हा यांनीही आयुष्यमान भारतवर प्रश्न उपस्थित केले. 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारायला हवा. कोणतीही आरोग्य योजना राबवताना हाच केंद्रबिंदू असायला हवा. मात्र आयुष्यमान योजनेत याचा विचार झालेला नाही,' असं सिन्हा म्हणाले.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतAIIMS hospitalएम्स रुग्णालय