शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Ayodhya Verdict: आता प्रत्येक भारतीयावरची राष्ट्रनिर्मितीची जबाबदारी वाढली - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 18:17 IST

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका महत्वपूर्ण प्रकरणावर निकाल दिला आहे. शेकडो वर्षांचा इतिहास होता. भारताची लोकशाही किती जिवंत आहे हे जगाने पाहिले. देशातील प्रत्येक नागरिकाने खुल्या मनाने निकाल स्वीकार केला आहे. भारत ज्याच्यासाठी ओळखला जातो विविधतेत एकता याचा मी गर्वाने उल्लेख करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला संयमाने पाहिला आणि निकाल सर्वांच्या संमतीने लागला. देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायप्रणाली अभिनंदनास पात्र आहेत. 9 नोव्हेंबर हा असा दिवस आहे जेव्हा बर्लिनची भींत कोसळली होती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांच्या आहेत. आजची तारीख अयोध्या निकाल आणि करतारपूर कॉरिडॉरसाठी महत्वाची होती, असे मोदी यांनी देशवासियांना संबोधताना म्हटले.

आजच्या दिवसाचा संदेश जोडण्याचा आहे आणि मिळून जगण्याचा आहे. या प्रकरणांवरून कोणाच्या मनात कटुता उरली असेल तर त्याला तिलांजली देण्याचा आजचा दिवस आहे. न्यायालयाने देशाला कठीणातला कठीण विषय संविधानाच्या माध्यमातून सोडविता येतो, असा संदेश दिला आहे. भारताचे संविधान, न्यायिक प्रणाली यावर आपला विश्वास तसाच रहावा हे महत्वाचे आहे. हा निकाल नवीन पहाट घेऊन आला आहे. या वादाचा अनेक पिढ्यांवर परिणाम झाला होता. मात्र, नव्या पिढीने नवी सुरुवात करावी, नवीन भारताची सुरुवात करावी. माझ्या सोबत चालणारा कुठे मागे तर राहिला नाही ना, याची दक्षता घ्यावी, असेही मोदी म्हणाले.

राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर देशाच्या निर्माणाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रत्येक भारतीयाने त्याचे दायित्व, कर्तव्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारतासमोर आव्हाने अनेक आहेत. सर्वांनी एकत्र येऊन मात करावी, असे आवाहनही मोदी यांनी देशवासियांना केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर