शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अयोध्या राम मंदिर जमीन वादात तोडगा काढण्यामध्ये मध्यस्थ समितीला अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 06:31 IST

सर्वोच्च न्यायालय; ६ ऑगस्टपासून नियमित होणार सुनावणी

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर समाधानकारक तोडगा काढण्यात मध्यस्थ समिती अपयशी ठरली आहे. त्यामुळे या प्रकरणाची नियमित सुनावणी ६ आॅगस्टपासून घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सुनावणी सुरूच राहील, असेही न्यायालयाने सांगितले.

जमिनीच्या वादावार तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. एफ. एम. आय. कैफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्या समितीने आपला अहवाल न्यायालयाला सादर केला. त्यानंतर समितीला तोडगा काढण्यात अपयश आल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. समितीने जो अहवाल दिला, त्यातून दोन पक्षकारांमध्ये तोडगा निघालेला नाही, असे आढळून आले आहे, असे ते म्हणाले. या खंडपीठात न्या. गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचुड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. ए. नझीर यांचा समावेश आहे. न्या कैफुल्ला समितीला अपयश आल्यास नियमित सुनावणी घेण्याचे न्यायालयाने याआधीच स्पष्ट केले होते.आठवड्यातून तीन दिवसही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आठवड्यात तीनदा होणार आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवारी हे ते तीन दिवस असतील. न्यायालयाने न्या कैफुल्ला समितीही बरखास्त करण्याचे न्यायालयाने नमूद केले. या सुनावणीसाठी सर्व संबंधितांनी कागदपत्रे तयार ठेवावीत, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरMumbaiमुंबईSupreme Courtसर्वोच्च न्यायालय