शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दररोज २.५ लाख भाविकांचे रामदर्शन; कोट्यवधींचे दान जमा, मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 15:13 IST

Ayodhya Ram Mandir: आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे.

Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर लोकार्पण झाल्यानंतर देशभरातील लाखो भाविक रामदर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. आतापर्यंत सुमारे १५ लाखांहून अधिक भाविकांनी रामदर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कोट्यवधींचे दान, सोने-चांदीच्या वस्तूही भाविक श्रीरामचरणी अर्पण करत आहेत. 

रामललाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भव्य राम मंदिरात पोहोचत आहेत. हा आकडा सातत्याने वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून शनिवारी राम मंदिर परिसराचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात आला. आयुक्तांनी माहिती देताना सांगितले की, दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक राम मंदिरात दर्शनासाठी पोहोचत आहेत. आधी मंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांची गर्दी होत असे. मात्र, आता यात बदल झाला आहे. रामदर्शनासाठी भाविक समूहाने येत आहेत. आगामी काळातही हाच ट्रेंड कायम राहण्याची अपेक्षा आहे.

राम मंदिर ट्रस्टने घेतला मोठा निर्णय

रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर ट्रस्टने रामललाची आरती आणि दर्शनाची वेळ वाढवली आहे. रामभक्त रामललाच्या दरबारात मोठ्या प्रमाणावर दान करत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून राम मंदिरासाठी देणगी घेतली जात आहे. 

दरम्यान, प्राप्त आकड्यांनुसार, आतापर्यंत कोट्यवधींची देणगी मिळाली आहे. रामलला दर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी ९० लाख रुपये, २४ जानेवारीला २ कोटी ४३ लाख रुपये, २५ जानेवारीला ८ लाख ५० हजार रुपये आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी १ कोटी १५ लाख रुपये दान करण्यात आल्याचे समजते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश