शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Ayodhya Ram Mandir: उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे फक्त 'राम की बात' नाही, तर 'राज की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 12:28 IST

बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना उत्तर प्रदेशात पाय रोवण्यात मागे राहिली होती.

लखनऊः 'पहले मंदिर, फिर सरकार' असा नारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार आहेत आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'बाण' सोडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा अजेंडा वरवर पाहता राम मंदिर हा असला, तरी श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणं जुळवण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्याला आकड्यांचा आधारही आहे. 

शिवसेनेनं १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली होती. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला होता. तेव्हापासून गेल्या २७ वर्षांत पक्षानं तिथे १४ निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, शिवसेनेचा सगळा फोकस महाराष्ट्रावरच होता - आहे. इतर राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत, पण त्या वाढवण्याच्या दृष्टीने कधीच प्रयत्न झाले नाहीत. विशेषतः बाबरी मशीद पाडल्यानंतर उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने प्रभावी ठरतोय. अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी यशस्वीपणे पाय रोवलेत. पण, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी, बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना त्यात मागेच राहिली. आता अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे उत्तरेत शिवसेनेचा झेंडा फडकवतील, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधलं.    

विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही सातत्याने 'मंदिर वही बनायेंगे'चा संकल्प केलाय. त्याचा प्रचंड फायदा भाजपाला झाला. परंतु, मोदी सरकारच्या कार्यकाळातही मंदिर उभारणीच्या दृष्टीनं ठोस काहीच घडलेलं नाही. त्यांच्यावर दबाव आणण्यात संघही अपयशी ठरलाय. नेमकं हेच काम करून राम मंदिराचा मुद्दा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. २०१९च्या निवडणुकांआधी भाजपालाही या विषयासंदर्भात नक्कीच काहीतरी हालचाल करावी लागेल. तेव्हा त्याचं श्रेय शिवसेनेला मिळू शकेल, असं गणितही उद्धव यांच्या डोक्यात असू शकतं.   

काही वर्षांपूर्वी भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं परप्रांतियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही विरोध केला होता. त्यामुळे यूपीत शिवसेनेची प्रतिमा वेगळी आहे. त्याचाही त्यांना फटका बसतोय. त्यामुळे हे सगळं झालं गेलं शरयू नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे नक्कीच करतील. 

अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची देशभरात 'हवा' करण्यात शिवसेना यशस्वी ठरलीय. परंतु, हा सगळा 'स्टंट' असल्याची टीका-टिप्पणी महाराष्ट्रातील विरोधक करताहेत. त्यामुळे हे 'उत्तरायण' उद्धव यांनी कितपत फायद्याचं ठरतं, याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकांमधून मिळेल.  

उत्तर प्रदेशमधील शिवसेनेची कामगिरी

लोकसभा निवडणूकः शिवसेनेने लढवलेल्या जागा१९९१ - ५ जागा १९९६ - २६ जागा१९९८ - ५ जागा१९९९ - १५ जागा२००४ - ९ जागा२००९ - १ जागा२०१४ - ८ जागाएकही जागा जिंकता आली नाही. 

विधानसभा निवडणूकः १९९१ - १४ जागा लढवल्या - एक जिंकली१९९३ - १८० जागा लढवल्या१९९६ - २४ जागा लढवल्या२००१ - ३९ जागा लढवल्या२००७ - ५९ जागा लढवल्या२०१२ - ३१ जागा लढवल्या२०१७ - ५९ जागा लढवल्या

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना