शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

Ayodhya Ram Mandir: उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे फक्त 'राम की बात' नाही, तर 'राज की बात'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 12:28 IST

बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना उत्तर प्रदेशात पाय रोवण्यात मागे राहिली होती.

लखनऊः 'पहले मंदिर, फिर सरकार' असा नारा देत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार आहेत आणि राम मंदिराच्या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'बाण' सोडणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा अजेंडा वरवर पाहता राम मंदिर हा असला, तरी श्रीरामाचा आशीर्वाद घेऊन उत्तर प्रदेशात राजकीय समीकरणं जुळवण्याचाही शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्याला आकड्यांचा आधारही आहे. 

शिवसेनेनं १९९१ मध्ये उत्तर प्रदेशात निवडणूक लढवली होती. त्यावेळी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच तापलेला होता. तेव्हापासून गेल्या २७ वर्षांत पक्षानं तिथे १४ निवडणुका लढवल्या, पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, शिवसेनेचा सगळा फोकस महाराष्ट्रावरच होता - आहे. इतर राज्यांमध्ये त्यांच्या शाखा आहेत, पण त्या वाढवण्याच्या दृष्टीने कधीच प्रयत्न झाले नाहीत. विशेषतः बाबरी मशीद पाडल्यानंतर उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने प्रभावी ठरतोय. अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी यशस्वीपणे पाय रोवलेत. पण, हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी, बाबरी मशीद पाडणाऱ्यांची जाहीरपणे पाठ थोपटणारी शिवसेना त्यात मागेच राहिली. आता अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे उत्तरेत शिवसेनेचा झेंडा फडकवतील, याकडे अभ्यासकांनी लक्ष वेधलं.    

विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंही सातत्याने 'मंदिर वही बनायेंगे'चा संकल्प केलाय. त्याचा प्रचंड फायदा भाजपाला झाला. परंतु, मोदी सरकारच्या कार्यकाळातही मंदिर उभारणीच्या दृष्टीनं ठोस काहीच घडलेलं नाही. त्यांच्यावर दबाव आणण्यात संघही अपयशी ठरलाय. नेमकं हेच काम करून राम मंदिराचा मुद्दा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे. २०१९च्या निवडणुकांआधी भाजपालाही या विषयासंदर्भात नक्कीच काहीतरी हालचाल करावी लागेल. तेव्हा त्याचं श्रेय शिवसेनेला मिळू शकेल, असं गणितही उद्धव यांच्या डोक्यात असू शकतं.   

काही वर्षांपूर्वी भूमिपुत्रांच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं परप्रांतियांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही विरोध केला होता. त्यामुळे यूपीत शिवसेनेची प्रतिमा वेगळी आहे. त्याचाही त्यांना फटका बसतोय. त्यामुळे हे सगळं झालं गेलं शरयू नदीत विसर्जित करण्याचा प्रयत्नही उद्धव ठाकरे नक्कीच करतील. 

अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची देशभरात 'हवा' करण्यात शिवसेना यशस्वी ठरलीय. परंतु, हा सगळा 'स्टंट' असल्याची टीका-टिप्पणी महाराष्ट्रातील विरोधक करताहेत. त्यामुळे हे 'उत्तरायण' उद्धव यांनी कितपत फायद्याचं ठरतं, याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकांमधून मिळेल.  

उत्तर प्रदेशमधील शिवसेनेची कामगिरी

लोकसभा निवडणूकः शिवसेनेने लढवलेल्या जागा१९९१ - ५ जागा १९९६ - २६ जागा१९९८ - ५ जागा१९९९ - १५ जागा२००४ - ९ जागा२००९ - १ जागा२०१४ - ८ जागाएकही जागा जिंकता आली नाही. 

विधानसभा निवडणूकः १९९१ - १४ जागा लढवल्या - एक जिंकली१९९३ - १८० जागा लढवल्या१९९६ - २४ जागा लढवल्या२००१ - ३९ जागा लढवल्या२००७ - ५९ जागा लढवल्या२०१२ - ३१ जागा लढवल्या२०१७ - ५९ जागा लढवल्या

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना