शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

मक्का आणि व्हॅटिकन सिटी मागे पडले; 48 दिवसांत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 14:49 IST

Ayodhya Ram Mandir: भगवान श्रीरामाचे भव्य राम मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. यामुळे अयोध्येचा विकास मोठ्या प्रमाणावर होत आहे.

Ayodhya Ram Mandir: श्रीराम भक्तांची अनेक दशकांची इच्छा पूर्ण झाली अन् अखेर 22 जानेवारी 2024 रोजी भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. रामललाच्या येण्याने अयोध्येचे जुने वैभव पुन्हा परत आले आहे. पूर्वी मागास शहर म्हणून ओळख असलेल्या अयोध्येत आता अनेक सुविधा मिळत आहेत. त्यामुळेच देशासह जगभरातून रामभक्त रामललाच्या दर्शनासाठी अयोध्या नगरीत मोठ्या संख्येने येताहेत. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, दररोज सुमारे दीड ते दोन लाख भाविक रामललाचे दर्शन  घेत आहेत. सुट्टीच्या दिवशी ही संख्या अनेक पटींनी वाढते.

रामनगरी अयोध्या आता धार्मिक राजधानी म्हणून उदयास येत आहे. रामलला 22 जानेवारीला विराजमान झाले, तेव्हापासून लाखो भाविक रामनगरीत दाखल होताहेत. गेल्या 2 महिन्यांबद्दल बोलायचे झाले, तर एक कोटीहून अधिक लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहेत. संपूर्ण जगात एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही धार्मिक स्थळी भाविक पोहोचलेले नाहीत. ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या व्हॅटिकन सिटीला दरवर्षी सुमारे 90 लाख लोक भेट देतात, तर गेल्या वर्षी 13.5 कोटी लोकांनी मुस्लिमांचे सर्वात मोठे पवित्र स्थान मक्का येथे भेट दिली होती. राम मंदिराबाबत बोलायचे झाले तर दररोज लाखो भाविक येत असून अवघ्या दीड ते दोन महिन्यांत सुमारे एक कोटी लोकांनी रामललाचे आशीर्वाद घेतले आहेत.

रोजगाराच्या संधीही वाढल्याभाविकांची संख्या वाढल्यामुळे अयोध्येत रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. शहरात सर्वत्र व्यवसाय तर विस्तारत आहेच, शिवाय रामनगरीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना रोजगाराच्या इतर संधीही उपलब्ध होत आहेत. रामनगरीमध्ये अवघ्या दोन महिन्यांत एक कोटींहून अधिक लोकांनी दर्शन घेतले, तर उरलेल्या 10 महिन्यांचा आकडा काय असेल, याची कल्पना करा.

1.25 कोटी भाविक आले-ट्रस्टचा दावाराम मंदिर ट्रस्टचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दावा केला की, 1 कोटी 25 लाखांहून अधिक रामभक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. लोक मक्का-मदिना येथे फक्त हजच्या वेळी जातात, ख्रिश्चन धार्मिक स्थळांनाही केवळ विशेष सणांवर जातात. पण, अयोध्येत दररोज जवळपास 2 लाख लोक येत आहेत. दरम्यान, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, राम मंदिरातील रामभक्तांची मोजणी तंत्रज्ञानाच्या आधारे केली जाते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये अनेक सॉफ्टवेअर बसवण्यात आले असून, त्याद्वारे भाविकांची संख्या मोजली जाते. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेश