शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Ayodhya Ram Mandir Land: 24 तासांतच सपा नेत्याच्या दाव्यांची पोलखोल, 10 वर्षांपूर्वीच झाले होते जमिनिचे अ‍ॅग्रीमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 13:00 IST

ट्रस्टच्या नावने संबंधित जमिनीचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट करणारे सुल्तान अंसारी म्हणाले, संबंधित जमिनीच्या विक्रीत ना आम्ही ना ट्रस्टने कसल्याही प्रकारची फसवणूक केली. घोटाळ्यांचा आरोप करणारे, अनावश्यक बडबड करत आहेत.

अयोध्या- रामजन्मभूमी परिसरापासून काही अंतरावरच असलेल्या मुहल्ला बाग बिजेसीच्या ज्या जमिनीच्या खरेदीसंदर्भात रविवारी सपा नेते तथा राज्य सरकारचे माजी मंत्री तेजनारायण पांडेय पवन यांनी घोटाळ्याचा आरोप केला होता, त्याची हवा केवळ 24 तासांच्या आतच निघायला सुरुवात झाली आहे. सपा नेत्याच्या आरोपाचा मुख्य आधार असा होता, की यावर्ष 18 मार्चला ज्या जमिनीचे तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 18.50 कोटी रुपयांत रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट केले, त्या जमिनीचे अ‍ॅग्रीमेंट करणारे रविमोहन तिवारी आणि सुल्तान अंसारी यांनी त्याच तारखेला 10 मिनिटांपूर्वीच केवळ दोन कोटी रुपयांत विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.

हे सांगतानाच माजी मंत्र्यांनी आरोप केला होता, की दोन कोटी रुपयांची जमीन 18.50 कोटी रुपयांत अ‍ॅग्रीमेंट करताना कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. मात्र, सत्य असे आहे, की संबंधित जमिनीचे चार मार्च 2011 रोजीच म्हणजे 10 वर्षांपूर्वीच मो. इरफान, हरिदास तथा कुसूम पाठक यांनी दोन कोटी रुपयांत रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट केले होते. तीन वर्षांपूर्वी या अ‍ॅग्रीमेंटचे नुतनीकरणही करण्यात आले. 2017 मध्ये हरिदास तथा कुसूम पाठक यांनी जमिनीचे मालक नूर आलम, महफूज आलम आणि जावेद आलम यांच्याकडून या जमिनीचा लेखी करार केला आणि हरिदास व कुसूम पाठक यांच्याकडून ही जमीन 17 सप्टेंबर 2019 रोजी रविमोहन तिवारी, सुल्तान अंसारी आदी आठ लोकांनी अ‍ॅग्रीमेंट करून घेतली. तसेच रविमोहन तथा सुल्तान अंसारी यांनीच या जमिनीचा 18 मार्चला विक्रीसंदर्भात लेखी करार (sell deed) केला.

अयोध्येत राम मंदिराच्या कामाला गती, RCC तंत्रज्ञानाने होतेय पायाभरणी

माजी मंत्री, जी जमीन दोन कोटी रुपयांची सांगून, ती 18.50 कोटी रुपयांत विकत घेण्यावर आक्षेप घेत आहेत, तिचा ठरलेला भाव चार हजार आठशे रुपये चौरस मीटरने देखील त्याची किंमत पाच कोटी 79 लाख 84 हजारपर्यंत जाते. तर बाग बिजेसी तथा रामनगरीच्या जवळपसच्या जमिनीचा सध्याचा सरासरी भाव दो हजार रुपये चौरस फूट आहे आणि याचा विचार करता, ट्रस्टने संबंधित जमिनीसाठी सरासही किंमतीपेक्षाही अत्यंत कमी किंमत मोजली आहे. संबंधीत जमिनीचे क्षेत्रफळ 12 हजार 80 चौरस मीटर, म्हणजेच एक लाख 29 हजार 981 चौरस फूट आहे. आणि या हिशेबाने ट्रस्टने 1423 रुपये चौरस फूट प्रमाणे जमिनीसाठी पैसे मोजले आहेत. 

संत मंडळींत आक्रोश, असे आरोप म्हणजे कट-कारस्थान - रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर माजी मंत्र्याने तथा सपा नेत्याने केलेल्या आरोपांमुळे साधू-संत संतापले आहेत. रामललाचे मुख्य आचार्य सत्येंद्रदास म्हणाले, अशा प्रकारचे आरोप करण्यासाठी लोक स्वतंत्र आहेत आणि त्यांच्या समाधानासाठी चौकशीही केली जाऊ शकते. मात्र, ट्रस्टचा प्रामाणिकपणा आणि रामललांच्या प्रति असलेल्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. 

राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा?; अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे झाले १८ कोटी

कुणाचीही फसवणूक झालेली नाही - सुल्तानट्रस्टच्या नावने संबंधित जमिनीचे रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंट करणारे सुल्तान अंसारी म्हणाले, संबंधित जमिनीच्या विक्रीत ना आम्ही ना ट्रस्टने कसल्याही प्रकारची फसवणूक केली. घोटाळ्यांचा आरोप करणारे, अनावश्यक बडबड करत आहेत. सत्य, असे आहे, की दहा वर्षांपूर्वी अयोध्येत जमीनीची किंम्मत अत्यंत कमी होती, तेव्हाच आम्ही दोन कोटी रुपयांत संबंधित जमिनीचे अ‍ॅग्रीमेंट केले होते. तीर्थ क्षेत्राला दिलेल्या जमिनीत घोटाळा करण्यात आला, असे म्हणणे चुकीचे आहे. खरे तर राम मंदिरासाठी सहकार्याची भावना मनात ठेवून या जमिनीचे बाजार भावापेक्षाही खूप कमी किंमती अ‍ॅग्रीमेंट करण्यात आले आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश