शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

नमाज प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे नाहीच; सर्वोच्च निकालानं अयोध्येच्या सुनावणीचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:03 IST

29 ऑक्टोबरपासून होणार अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे, हे प्रकरण आता मोठ्या घटनापीठाकडे जाणार नसल्यानं रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नमाज इस्लामचं अभिन्न अंग आहे का, याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचा का, यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची गरज नसल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. हा महत्त्वपूर्ण निकाल देणाऱ्या घटनापीठात तीन न्यायमूर्तींचा समावेश होता. मात्र या प्रकरणात तीन न्यायाधीशांचं एकमत झालं नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अशोक भूषण, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्या निकालाचं वाचन केल्यावर न्यायमूर्ती नजीर यांनी त्यांच्या निकालपत्राचं वाचन केलं. त्यामुळे अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.प्रत्येक निर्णय वेगवेगळ्या परिस्थितीत दिला जातो, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं. 1994 मध्ये दिला जाणारा निकाल वेगळ्या परिस्थितीत दिला गेला होता. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निकाल 1994 च्या इस्माइल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र तो निकाल वेगळ्या परिस्थितीत देण्यात आला होता. न्यायालयानं दिलेला तो निकाल म्हणजे धार्मिक भाष्य नव्हतं, असं भूषण यांनी म्हटलं. दीपक मिश्रा यांच्या वतीनं त्यांनी या निकालाचं वाचन केलं. तर न्यायमूर्ती नजीर यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जायला हवं, असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNamajनमाज