शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नमाज प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे नाहीच; सर्वोच्च निकालानं अयोध्येच्या सुनावणीचा मार्ग मोकळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:03 IST

29 ऑक्टोबरपासून होणार अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाची सुनावणी

नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही हा मुद्दा मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या घटनापीठानं दोनास एक असा हा निकाल दिला. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे, हे प्रकरण आता मोठ्या घटनापीठाकडे जाणार नसल्यानं रामजन्मभूमी प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नमाज इस्लामचं अभिन्न अंग आहे का, याचा निर्णय मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचा का, यावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची गरज नसल्याचा निर्णय न्यायालयानं दिला. हा महत्त्वपूर्ण निकाल देणाऱ्या घटनापीठात तीन न्यायमूर्तींचा समावेश होता. मात्र या प्रकरणात तीन न्यायाधीशांचं एकमत झालं नाही. त्यामुळे न्यायमूर्ती अशोक भूषण, सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी त्यांच्या निकालाचं वाचन केल्यावर न्यायमूर्ती नजीर यांनी त्यांच्या निकालपत्राचं वाचन केलं. त्यामुळे अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल.प्रत्येक निर्णय वेगवेगळ्या परिस्थितीत दिला जातो, असं न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी म्हटलं. 1994 मध्ये दिला जाणारा निकाल वेगळ्या परिस्थितीत दिला गेला होता. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असा निकाल 1994 च्या इस्माइल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र तो निकाल वेगळ्या परिस्थितीत देण्यात आला होता. न्यायालयानं दिलेला तो निकाल म्हणजे धार्मिक भाष्य नव्हतं, असं भूषण यांनी म्हटलं. दीपक मिश्रा यांच्या वतीनं त्यांनी या निकालाचं वाचन केलं. तर न्यायमूर्ती नजीर यांनी हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे जायला हवं, असं म्हटलं होतं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNamajनमाज