शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! अयोध्येत 95 वर्षीय महंत मृत असल्याचे सांगून भूमाफियांनी ह़डपली कोट्यवधींची जमीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 10:25 IST

महंतांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना त्यांच्या जमिनीवरून पळवून लावले, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला.

अयोध्येत हनुमानगढीच्या 95 वर्षीय महंताच्या जमिनीवर भूमाफियांनी कब्जा केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महंत जुगल बिहारी दास यांची जमीन होती, मात्र गौरीशंकर याने त्यांना मृत झाल्याचं सांगून कोट्यवधींची ती जमीन बळकावली. महंतांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना त्यांच्या जमिनीवरून पळवून लावले, बंदुकीचा धाक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे. आता गेली 10 वर्षे स्वत:ला जिवंत असल्याचं सिद्ध करत तेआपली जमीन परत मिळवण्यासाठी कोर्टाच्या चकरा मारत आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या महिन्यात जनता दर्शनादरम्यान जमिनीशी संबंधित तक्रारींवर म्हटले होते की, जर कोणी माफिया एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करत असेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. श्रीराम मंदिरामुळे अयोध्येतील जमिनींचे दर खूप वाढले आहेत. गेल्या वर्षी अयोध्या विकास प्राधिकरणाने 40 बेकायदेशीर भूखंडधारकांची यादी जारी केली होती. या यादीत अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय, शहराचे आमदार वेदप्रकाश गुप्ता आणि माजी आमदार गोरखनाथ बाबा यांच्या नावांचा समावेश आहे. 

वाद वाढल्यानंतर अयोध्या विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि महापालिका आयुक्त विशाल सिंह यांनी प्राधिकरणाची यादी बनावट असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते. अयोध्येतील भाजपा खासदार लल्लू सिंह यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अधिकारी आणि भूमाफिया यांच्यातील संबंधाबाबत पत्र लिहून एसआयटी स्थापन करून तपास करण्याची मागणी केली होती. त्यांनी लिहिले की, अयोध्येत भूमाफियांचे इतके वर्चस्व आहे. 

शहरांमध्ये राहायला इच्छिणाऱ्यांना या जमिनी विकून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. जामथरा घाटापासून गोलाघाटपर्यंतच्या जमिनींवर भूमाफियांचा धंदा फोफावत आहे. त्यांनी लिहिले की, तीन दशकांपासून उत्तर प्रदेश सरकारकडून लीज दिली जात नाही किंवा लीजचे नूतनीकरणही केले जात नाही. काही क्षेत्रातील जमिनीवर फ्री होल्ड नाही, तरीही भूमाफियांनी कोणत्या परिस्थितीत काही क्षेत्रातील जमीन विकली, त्यावर कायमस्वरूपी व तात्पुरत्या लोकांकडून बांधकाम केले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ayodhyaअयोध्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ