शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अयोध्या : 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करा, सरन्यायाधीशांची सर्व पक्षकारांना सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:23 IST

गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

नवी दिल्ली - गेल्या तीन दशकांत देशातील राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुानवणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी खटल्याच्या सुनावणीसाठी कालमर्यादा निश्चित केली असून, सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यामध्ये अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा अंतिम निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांसाठी सुनावणी थांबवण्यात येणार नाही. न्यायालयातील सुनावणीबरोबरच मध्यस्थीचे प्रयत्न सुरू ठेवता येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच  सर्व पक्षकारांना 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावेत, अशी सूचनाही सरन्यायाधीशांनी या खटल्यातील सर्व पक्षकारांना केली.  

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी अयोध्या प्रकरणी निकाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अत्यंत संवेदनशील असलेल्या या खटल्याच्या सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून दररोज एक तास अधिक सुनावणी घेण्याचा तसेच शनिवारीदेखील सुनावणी घेण्याचा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे.  आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ''राम मंदिर जन्मभूमी खटल्यातील सर्व पक्षकारांचे युक्तिवाद आणि दावे 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत. जेणेकरून निकाल लिहिण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल.'' त्यावर उत्तर देताना मुस्लिम पक्षकारांनी आपला युक्तिवाद 27 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील असे सांगितले. तर मुस्लिम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी आपल्यालाही उलट तपासणीसाठी दोन दिवस लागतील, असे सांगितले. ''या खटल्यात मध्यस्थीसाठी आम्हाला पत्र मिळाले आहे. आता हे प्रयत्न नियमित सुनावणीपासून स्वतंत्रपणे समांतर पातळीवर सुरू ठेवता येतील, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Ayodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालय