शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...जेथे राघव, तेथे श्रीरामायण एक्सप्रेस; अयोध्या ते कोलंबो भारतीय रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 13:32 IST

नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात यामुळे अयोध्या ते कोलंबो असा प्रवास यात्रेकरुंना करता येईल. हा प्रवास १६ दिवसांचा असेल.

ही रेल्वे दिल्लीमधून प्रवासाला सुरुवात करेल. सफदरगंज स्थानकावरुन प्रवास सुरु झाल्यावर प्रभू रामांच्या राजधानी अयोध्येतील विविध धार्मिक स्थानांचे दर्शन पर्यटकांना घेता येईल. त्यानंतर ही रेल्वे नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, शृंगवेरपूर, चित्रकूट असा प्रवास करत मंदाकिनीच्या तटनिकटी म्हणजे महाराष्ट्रात नाशिकमध्ये येईल. नाशिकनंतर ही रेल्वे कर्नाटकात हंपी येथे जाईल. हंपीनंतर ती रामेश्वरम येथे जाईल. यातील ज्या स्थळांमध्ये रेल्वे स्थानक नसेल त्यास्थळांच्या जवळील रेल्वेस्थानकापर्यंत रेल्वे जाईल.

या प्रवासासाठी भारतीय रेल्वे १५ हजार १२० रुपये आकारणार असून एकावेळेस रेल्वेत ८०० प्रवासी असतील ज्या प्रवाशांना श्रीलंकेत जायचे असेल त्यांना चेन्नईतून अधिक पैसे देऊन विमानाने जाता येईल. श्रीलंकेत पाच रात्री व सहा दिवसांच्या प्रवासासाठी ४७ हजार ६०० रुपये आकारण्यात येतील. त्यात कँडी, कोलंबो, नुवारा एलिया, नोगोंबो येथे पर्यटकांना जाता येईल.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे