शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कोरोनात सत्कार समारंभ टाळा, लगेचच कामाला लागा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नव्या मंत्र्यांना संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 06:07 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा.

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला.केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा. अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका, अशा सूचना भाजपने सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले.कोरोनावर नियंत्रण, उद्योग व अर्थचक्र पुन्हा रुळावर आणणे, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे यावर भर देणे आवश्यक आहे, असेही मंत्र्यांना सांगण्यात आल्याचे समजते. गुरुवारी नव्या केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या खात्यांची सूत्रे स्वीकारली. नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, रेल्वे व माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, ऊर्जामंत्री आर. के. सिंह, माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, कायदामंत्री किरण रिजिजू आदींनी त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली; तसेच आपल्याला ही संधी दिल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपिल पाटील या नव्या राज्यमंत्र्यांनीही पदभार स्वीकारला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोळसा मंत्रालयाची सूत्रे प्रल्हादभाई पटेल यांच्याकडून स्वत:कडे घेतली. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, धर्मेंद्र प्रधान, हरदीप पुरी, मुंजपारा महेंद्रभाई, भूपेंदर यादव, जॉन बारला आदी मंत्र्यांनीही गुरुवारी आपापल्या खात्याची सूत्रे स्वीकारली.

भाजपच्या अध्यक्षांनी मंत्र्यांना केले मार्गदर्शननव्या मंत्र्यांनी कशा प्रकारे कारभार करावा, तसेच त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व पक्षाला नेमके काय अपेक्षित आहे, याविषयी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्र्यांना मार्गदर्शन केले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार