शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 06:59 IST

निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे...

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी जात, समुदाय, भाषा आणि धार्मिक निकषांवर प्रचार करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला भाजप आणि काँग्रेसला दिला. निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये केलेल्या भाषणावरून भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना नोटीस बजावल्यानंतर  महिनाभरानंतर निवडणूक निरीक्षकांनी त्यांचा बचाव नाकारला. भाजपच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांना धार्मिक आणि सांप्रदायिक प्रचारापासून दूर राहण्यास सांगितले. समाजात फूट पाडणारी प्रचाराची भाषणे थांबवावीत, असेही आयोगाने भाजपला सांगितले. नड्डा यांच्यासह निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनाही अशीच नोटीस बजावून त्यांना विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने केलेल्या तक्रारींना उत्तर देण्यास सांगितले होते.

निवडणूक आयोगाने खरगे यांचाही बचाव नाकारला. संरक्षण दलांचे राजकारण करू नये, तसेच सशस्त्र दलांच्या सामाजिक - आर्थिक रचनेबाबत संभाव्य फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे सांगितले. त्यांचे स्टार प्रचारक आणि उमेदवार राज्यघटना रद्द किंवा बदलली जाऊ शकते, असा चुकीचा आभास देणारी विधाने करणार नाहीत, याची काळजी घेण्याचे निर्देशही आयोगाने खरगे यांना दिले. 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करा- देशातील निवडणुकीची परंपरा आणि लोकशाहीच्या मूल्यांना कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामा नये. राजकीय पक्षांवर वर्तमानातच नव्हे, तर भविष्यातील नेते घडविण्याची जबाबदारी आहे.- पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना प्रचारावेळी शिस्त व नियमावलींबाबत मार्गदर्शन करावे, असा सल्ला आयोगाने दिला आहे. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण