शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:26 IST

या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महायुतीच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे. महायुतीचा विजय दैवी शक्तीमुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला असा विजय मिळाला नाही, जो आता मिळाला आहे. मग लोकांना हे का समजले नाही? समजले नाही कारण दैवी शक्ती येथे काम करत होती. जेव्हा दैवी शक्ती कार्य करते तेव्हा मनुष्य त्याचे मूल्यमापन करू शकत नाही.

आम्हाला आभास होता, यामुळेच आपण बघितले असेल की, इतिहासात पहिल्यांदाच शंकराचार्य म्हणून आम्ही कोणाच्या तरी पक्षासाठी सांगितले की, जनतेने त्यांना मतदान करावे आणि आशीर्वाद द्यावा. आम्ही असे का म्हणालो? आम्ही आमची मर्यादा विसरत होतो का? विसरत नव्हतो. आम्ही दैवी शक्तीचा अनुभव करत होतो. हा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना मिळाला.

शंकराचार्य पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन असे काम केले, जे स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षांच्या इतिसाहात कुणालाही शक्य झाले नाही. गायीला प्राण्यांच्या यादीतून काढून राज्य मातेचा दर्जा दिला. त्याच वेळी, या व्यक्तीला गो मातेचा आशीर्वाद मिळणार, असे आम्हाला वाटले. जसजशा निवडणुका जवळ आल्या, तसतसे आम्हाला हे ठामपणे वाटू लागले आणि गो मातेने आपला पुत्र एकनाथ शिंदे यांना असा आशीर्वाद दिला, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कामगिरीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचा प्रवाह कायम ठेवला आहे. यामुळेच जनतेने त्यांना 57 जागा दिल्या आहेत. अर्थात बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आजही जिवंत आहे. मात्र, तिचे नेतृत्व आता त्यांचे पुत्र नव्हे तर शिष्य करत आहेत." उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत केवळ 20 जागाच मिळाल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना