शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 19:26 IST

या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर, शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी महायुतीच्या विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे. महायुतीचा विजय दैवी शक्तीमुळे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. यात भाजपला 132, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला 57 आणि अजित दादा पवरा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

यासंदर्भात बोलताना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला असा विजय मिळाला नाही, जो आता मिळाला आहे. मग लोकांना हे का समजले नाही? समजले नाही कारण दैवी शक्ती येथे काम करत होती. जेव्हा दैवी शक्ती कार्य करते तेव्हा मनुष्य त्याचे मूल्यमापन करू शकत नाही.

आम्हाला आभास होता, यामुळेच आपण बघितले असेल की, इतिहासात पहिल्यांदाच शंकराचार्य म्हणून आम्ही कोणाच्या तरी पक्षासाठी सांगितले की, जनतेने त्यांना मतदान करावे आणि आशीर्वाद द्यावा. आम्ही असे का म्हणालो? आम्ही आमची मर्यादा विसरत होतो का? विसरत नव्हतो. आम्ही दैवी शक्तीचा अनुभव करत होतो. हा आशीर्वाद एकनाथ शिंदे यांना मिळाला.

शंकराचार्य पुढे म्हणाले, "एकनाथ शिंदे यांनी प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन असे काम केले, जे स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षांच्या इतिसाहात कुणालाही शक्य झाले नाही. गायीला प्राण्यांच्या यादीतून काढून राज्य मातेचा दर्जा दिला. त्याच वेळी, या व्यक्तीला गो मातेचा आशीर्वाद मिळणार, असे आम्हाला वाटले. जसजशा निवडणुका जवळ आल्या, तसतसे आम्हाला हे ठामपणे वाटू लागले आणि गो मातेने आपला पुत्र एकनाथ शिंदे यांना असा आशीर्वाद दिला, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कामगिरीवर बोलताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेचा प्रवाह कायम ठेवला आहे. यामुळेच जनतेने त्यांना 57 जागा दिल्या आहेत. अर्थात बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आजही जिवंत आहे. मात्र, तिचे नेतृत्व आता त्यांचे पुत्र नव्हे तर शिष्य करत आहेत." उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या निवडणुकीत केवळ 20 जागाच मिळाल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना