शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:50 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे.

बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरून आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही प्रश्न उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी I.N.D.I.A. चे नेतृत्व करण्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही प्रतिक्रिया दिली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे. आज बांगलादेश जरी बांगलादेश असला... तर पूर्वी तो पाकिस्तान होता आणि त्याआधीही तो भारत होता. ते हिंदू आपलेच आहेत आम्हीही त्यांच्याशी जोडलेलो आहोत. यामुळेच चिंतित आहोत."

ते पुढे म्हणाले, "भारत सरकार हे थांबवेल अशी आशा आहे आणि अशी विनंतीही आम्ही करत आहोत. मात्र, वेळ निघून जात आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत सरकार यावर योग्य पद्धतीने उत्तर द्यायला सक्षम नाही."

I.N.D.I.A.च्या नेतृत्वासंदर्भात काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद? - I.N.D.I.A.चे नेतृत्व करण्यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. ते म्हणाले, "मी अथवा बाहेरील कुणीही व्यक्ती यासंदर्भात बोलू शकत नाही. कुणी प्रतिनिधित्व करावे, याचा विचार आघाडीत सहभागी असलेले पक्ष करतील."

मानवाधिकार संघटना सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्सने (CDPHR) शुक्रवारी ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात 150 हून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ले, अनेक घरांना आग लावणे, सुमारे 20 मंदिरांची तोडफोड आणि लुटालूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत