शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:50 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे.

बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरून आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही प्रश्न उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी I.N.D.I.A. चे नेतृत्व करण्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही प्रतिक्रिया दिली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे. आज बांगलादेश जरी बांगलादेश असला... तर पूर्वी तो पाकिस्तान होता आणि त्याआधीही तो भारत होता. ते हिंदू आपलेच आहेत आम्हीही त्यांच्याशी जोडलेलो आहोत. यामुळेच चिंतित आहोत."

ते पुढे म्हणाले, "भारत सरकार हे थांबवेल अशी आशा आहे आणि अशी विनंतीही आम्ही करत आहोत. मात्र, वेळ निघून जात आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत सरकार यावर योग्य पद्धतीने उत्तर द्यायला सक्षम नाही."

I.N.D.I.A.च्या नेतृत्वासंदर्भात काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद? - I.N.D.I.A.चे नेतृत्व करण्यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. ते म्हणाले, "मी अथवा बाहेरील कुणीही व्यक्ती यासंदर्भात बोलू शकत नाही. कुणी प्रतिनिधित्व करावे, याचा विचार आघाडीत सहभागी असलेले पक्ष करतील."

मानवाधिकार संघटना सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्सने (CDPHR) शुक्रवारी ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात 150 हून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ले, अनेक घरांना आग लावणे, सुमारे 20 मंदिरांची तोडफोड आणि लुटालूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत