शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

"हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत..."; बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवरून अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 16:50 IST

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे.

बांगलादेशातहिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावरून आता शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवरही प्रश्न उपस्थित केला आहे. याचवेळी त्यांनी I.N.D.I.A. चे नेतृत्व करण्यावरून सुरू असलेल्या संघर्षावरही प्रतिक्रिया दिली आहे.

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "ज्या पद्धतीने बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर तेथील मुस्लीम अत्याचार करत आहेत, ह अत्यंत चिंतेची बाब आहे. आज बांगलादेश जरी बांगलादेश असला... तर पूर्वी तो पाकिस्तान होता आणि त्याआधीही तो भारत होता. ते हिंदू आपलेच आहेत आम्हीही त्यांच्याशी जोडलेलो आहोत. यामुळेच चिंतित आहोत."

ते पुढे म्हणाले, "भारत सरकार हे थांबवेल अशी आशा आहे आणि अशी विनंतीही आम्ही करत आहोत. मात्र, वेळ निघून जात आहे. यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ही विचार करण्याची गोष्ट आहे की, हिंदुत्ववादी सरकार असूनही भारत सरकार यावर योग्य पद्धतीने उत्तर द्यायला सक्षम नाही."

I.N.D.I.A.च्या नेतृत्वासंदर्भात काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद? - I.N.D.I.A.चे नेतृत्व करण्यासंदर्भातील प्रश्नावर ते म्हणाले, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. ते म्हणाले, "मी अथवा बाहेरील कुणीही व्यक्ती यासंदर्भात बोलू शकत नाही. कुणी प्रतिनिधित्व करावे, याचा विचार आघाडीत सहभागी असलेले पक्ष करतील."

मानवाधिकार संघटना सेंटर फॉर डेमोक्रसी, प्लुरॅलिझम अँड ह्युमन राइट्सने (CDPHR) शुक्रवारी ऑगस्ट 2024 मध्ये पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर, बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीसंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात 150 हून अधिक हिंदू कुटुंबांवर हल्ले, अनेक घरांना आग लावणे, सुमारे 20 मंदिरांची तोडफोड आणि लुटालूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत