शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

प्रचंड वायुप्रदूषणामुळे भारतीयांचे सरासरी वय होतेय दीड वर्षाने कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 06:57 IST

वायुप्रदूषण आणि आयुर्मर्यादा डेटाचे एकत्र अध्ययन प्रथमच करण्यात आले आहे

ह्यूस्टन : हवेतील प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी आयुष्य दीड वर्षाने कमी होत आहे, असे मत येथील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तथापि, शुद्ध हवेमुळे जगातील नागरिकांचे आयुष्यमान वाढू शकते, असेही त्यांनी आपल्या अध्ययनात म्हटले आहे.वायुप्रदूषण आणि आयुर्मर्यादा डेटाचे एकत्र अध्ययन प्रथमच करण्यात आले आहे. अमेरिकेतील आॅस्टिनमध्ये टेक्सास विद्यापीठाच्या संशोधकांनी हवेतील २.५ मायक्रॉनपेक्षा छोट्या कणाच्या (पीएम) वायुप्रदूषणाचे अध्ययन केले. हे सूक्ष्म कण फुप्फुसात प्रवेश करू शकतात. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, श्वसनाचे विकार आणि कॅन्सर होण्याचा धोका असतो.पीएम २.५ प्रदूषण वीज यंत्र, कार आणि ट्रकपासून होणारे प्रदूषण, आग, शेती आणि औद्योगिक उत्सर्जनातून होते. वैज्ञानिकांना असे दिसून आले की, प्रदूषित देशांमध्ये बांगलादेश १.८७ वर्ष, इजिप्तमध्ये १.८५, पाकिस्तान १.५६, सौदी अरब १.४८, नायजेरिया १.२८ आणि चीनमध्ये १.२५ वर्षांपर्यंत वय कमी होत आहे. या अध्ययनानुसार भारतीय व्यक्तीचे सरासरी वय १.५३ वर्षांनी कमी होत आहे....तर ८५ वयापर्यंत जगता येईलपर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान पत्रिकेत प्रकाशित लेखात या अध्ययनाचे नेतृत्व करणाऱ्या यहोशू एपटे यांनी म्हटले आहे की, वायू प्रदूषणामुळे जगभरात वयोमान कमी होत आहे. आशियामध्ये वायू प्रदूषणामुळे होणाºया मृत्यूची जोखीम समाप्त झाली तर, सरासरी ६० वर्ष जगणारी व्यक्ती ८५ वर्षांपर्यत जगू शकेल.

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणIndiaभारत