शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

२५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री बजार समितीच्या यार्डात लिलाव : शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १५ कर्मचारी, ५० हजार शुल्क बुडाले

By admin | Updated: July 13, 2016 00:14 IST

जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्‍यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्‍या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे.

जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्‍यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्‍या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे.

भाजीपाल्याची खरेदी व विक्री कुठल्याही शुल्काशिवाय झाल्याने अडतदारांना शेकडा सहा टक्के याप्रमाणे शुल्क देण्याची वेळ ग्राहकांवर आली नाही. यात अडतदारांचे संपामुळे मंगळवारी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुमारे २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री झाल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली.

यार्डात सकाळीच लिलाव
अडतदारांशिवाय बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डात सकाळी सहा वाजताच लिलाव सुरू झाले. शेतकर्‍यांनी भाव सांगितले आणि ग्राहकांनी आपल्या कुवतीनुसार खरेदी केली. जेवढा भाजीपाला आणला गेला तेवढा विकला गेला.

१५ कर्मचार्‍यांची नियुक्ती
बाजार समिती प्रशासनाने अडतदारांनी पुकारलेल्या संपामध्ये शेतकर्‍यांना त्रास होऊ नये, अडचणी येऊ नयेत यासाठी १५ कर्मचारी सकाळी सहा ते आठ या वेळेत फळ व भाजीपाला मार्केट यार्डात नियुक्ती केली आहे. तसे परिपत्रक जारी केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली.

बाजार समिती खुली राहणार
अडतदारांनी संप पुकारलेला असला तरी शेतकरी आपला शेतमाल थेट बाजार समितीमध्ये विकू शकतील. त्यासाठी बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डाचे दरवाजेे खुले राहतील. ग्राहकांनी रोज सकाळी यावे. कुठल्याही शुल्काशिवाय भाजीपाल्याची खरेदी विक्री करता येईल, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.

अडतदारांचे हित कोण जोपासणार?
बाजार समितीमध्ये अडतदार हे ग्राहक, शेतकरी, व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यांनी कधी शेतकर्‍यांची पिळवणूक होईल यासाठी काम केले नाही. शेतकर्‍यांना रोखीने पैसे मिळावेत, मागणी व पुरवठा याचे गणित लक्षात घेऊन भाव असावेत अशी भूमिका अडतदारांनी घेतली. परंतु आता खरेदीदारांकडून शुल्क घेण्यासंबंधी फतवा निघाला. तसेच खुला बाजारमुळे बाजार समितीच्या अस्तित्वावर, अडतदारांच्या अस्तित्वावर बंधने आणण्याचा प्रकार सुरू आहे. अडतदारांचेही हित जोपासले जावे, असे फळ व भाजीपाला मार्केट यार्ड अडत असोसिएशनने म्हटले आहे.