शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री बजार समितीच्या यार्डात लिलाव : शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १५ कर्मचारी, ५० हजार शुल्क बुडाले

By admin | Updated: July 13, 2016 00:14 IST

जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्‍यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्‍या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे.

जळगाव : बाजार समितीमधील फळ व भाजीपाला मार्केट यार्डातील अडतदारांनी पुकारलेला संप झुगारत शेतकर्‍यांच्या २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री अडतदारांशिवाय मंगळवारी बाजार समितीमध्ये झाली. यातच हा संप कायम ठेऊ, अशी भूमिका संपाच्या दुसर्‍या दिवशीही अडतदार असोसिएशनने जाहीर केली आहे.

भाजीपाल्याची खरेदी व विक्री कुठल्याही शुल्काशिवाय झाल्याने अडतदारांना शेकडा सहा टक्के याप्रमाणे शुल्क देण्याची वेळ ग्राहकांवर आली नाही. यात अडतदारांचे संपामुळे मंगळवारी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुमारे २५० क्विंटल भाजीपाल्याची विक्री झाल्याची माहिती सभापती प्रकाश नारखेडे यांनी दिली.

यार्डात सकाळीच लिलाव
अडतदारांशिवाय बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डात सकाळी सहा वाजताच लिलाव सुरू झाले. शेतकर्‍यांनी भाव सांगितले आणि ग्राहकांनी आपल्या कुवतीनुसार खरेदी केली. जेवढा भाजीपाला आणला गेला तेवढा विकला गेला.

१५ कर्मचार्‍यांची नियुक्ती
बाजार समिती प्रशासनाने अडतदारांनी पुकारलेल्या संपामध्ये शेतकर्‍यांना त्रास होऊ नये, अडचणी येऊ नयेत यासाठी १५ कर्मचारी सकाळी सहा ते आठ या वेळेत फळ व भाजीपाला मार्केट यार्डात नियुक्ती केली आहे. तसे परिपत्रक जारी केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव एस.पी.पाटील यांनी दिली.

बाजार समिती खुली राहणार
अडतदारांनी संप पुकारलेला असला तरी शेतकरी आपला शेतमाल थेट बाजार समितीमध्ये विकू शकतील. त्यासाठी बाजार समितीच्या फळ व भाजीपाला मार्केट यार्डाचे दरवाजेे खुले राहतील. ग्राहकांनी रोज सकाळी यावे. कुठल्याही शुल्काशिवाय भाजीपाल्याची खरेदी विक्री करता येईल, असे बाजार समिती प्रशासनाने म्हटले आहे.

अडतदारांचे हित कोण जोपासणार?
बाजार समितीमध्ये अडतदार हे ग्राहक, शेतकरी, व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यांनी कधी शेतकर्‍यांची पिळवणूक होईल यासाठी काम केले नाही. शेतकर्‍यांना रोखीने पैसे मिळावेत, मागणी व पुरवठा याचे गणित लक्षात घेऊन भाव असावेत अशी भूमिका अडतदारांनी घेतली. परंतु आता खरेदीदारांकडून शुल्क घेण्यासंबंधी फतवा निघाला. तसेच खुला बाजारमुळे बाजार समितीच्या अस्तित्वावर, अडतदारांच्या अस्तित्वावर बंधने आणण्याचा प्रकार सुरू आहे. अडतदारांचेही हित जोपासले जावे, असे फळ व भाजीपाला मार्केट यार्ड अडत असोसिएशनने म्हटले आहे.