शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:56 IST

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

नवी दिल्ली : काँग्रेससह विरोधी पक्ष विदेशी शक्ती, लोकांच्या माध्यमातून देशाची संसद, सरकार व अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुरुवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. प्रश्नोत्तरादरम्यान दुबेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य केले. या आरोपानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे दोन वेळा काही तासांसाठी लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. मात्र, दुपारी ३ नंतर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला.

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

एनएसयूआयचे कार्यकर्ते ताब्यात

देशातील वाढती बेरोजगारी व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआने संसदेच्या दिशेने गुरुवारी मोर्चा काढला.

मात्र, संसद परिसरात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

गोंधळ थांबेना

nसंसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांचे सभागृहातील वर्तन योग्य नसल्याचे स्पष्ट करत टीका केली. या गोंधळादरम्यान चर्चेला उत्तर देण्यासाठी पीठासीन सभापती दगदम्बिका पाल यांनी वैष्णव यांचे नाव पुकारले. त्यानंतर गोंधळ अधिकच वाढत गेला.

पाल यांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ थांबत नसल्याने कामकाज तहकूब झाले.

खा. दुबेंनी माफी मागावी : काँग्रेस

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे एका विदेशी गुंतवणूकदारासोबत संबंध जोडल्याबद्दल काँग्रेस पक्षाने भाजप खासदार निशिकांत दुबेंना लक्ष्य केले.

अदानी समूहाचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना बदनाम करण्याची जबाबदारी काही दलालांना दिली आहे. त्यामुळे दुबेंसारखे लोक गांधींवर टीका करत आहे.

दुबेंनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांकडे केली. 

सदस्यांनी नियमांचे पालन करावे : बिर्ला

संसद सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचे व प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

सभागृहात येताना कोणत्याही सदस्यांनी फलक घेऊन येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शाह