शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:56 IST

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

नवी दिल्ली : काँग्रेससह विरोधी पक्ष विदेशी शक्ती, लोकांच्या माध्यमातून देशाची संसद, सरकार व अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुरुवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. प्रश्नोत्तरादरम्यान दुबेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य केले. या आरोपानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे दोन वेळा काही तासांसाठी लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. मात्र, दुपारी ३ नंतर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला.

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

एनएसयूआयचे कार्यकर्ते ताब्यात

देशातील वाढती बेरोजगारी व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआने संसदेच्या दिशेने गुरुवारी मोर्चा काढला.

मात्र, संसद परिसरात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

गोंधळ थांबेना

nसंसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांचे सभागृहातील वर्तन योग्य नसल्याचे स्पष्ट करत टीका केली. या गोंधळादरम्यान चर्चेला उत्तर देण्यासाठी पीठासीन सभापती दगदम्बिका पाल यांनी वैष्णव यांचे नाव पुकारले. त्यानंतर गोंधळ अधिकच वाढत गेला.

पाल यांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ थांबत नसल्याने कामकाज तहकूब झाले.

खा. दुबेंनी माफी मागावी : काँग्रेस

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे एका विदेशी गुंतवणूकदारासोबत संबंध जोडल्याबद्दल काँग्रेस पक्षाने भाजप खासदार निशिकांत दुबेंना लक्ष्य केले.

अदानी समूहाचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना बदनाम करण्याची जबाबदारी काही दलालांना दिली आहे. त्यामुळे दुबेंसारखे लोक गांधींवर टीका करत आहे.

दुबेंनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांकडे केली. 

सदस्यांनी नियमांचे पालन करावे : बिर्ला

संसद सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचे व प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

सभागृहात येताना कोणत्याही सदस्यांनी फलक घेऊन येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शाह