शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप; मोठ्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 08:56 IST

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

नवी दिल्ली : काँग्रेससह विरोधी पक्ष विदेशी शक्ती, लोकांच्या माध्यमातून देशाची संसद, सरकार व अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप गुरुवारी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केला. प्रश्नोत्तरादरम्यान दुबेंनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य केले. या आरोपानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे दोन वेळा काही तासांसाठी लोकसभेचे कामकाज स्थगित झाले. मात्र, दुपारी ३ नंतर लोकसभा दिवसभरासाठी तहकूब झाली. राज्यसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला.

काँग्रेससह विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी गदारोळ सुरू करत अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणाबाजी केली. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांना बोलण्याची संधी दिली जावी ही मागणी लावून धरत काँग्रेस सदस्यांनी गोंधळ घातला.

एनएसयूआयचे कार्यकर्ते ताब्यात

देशातील वाढती बेरोजगारी व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचार या मुद्द्यासह विविध मागण्यासाठी काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआने संसदेच्या दिशेने गुरुवारी मोर्चा काढला.

मात्र, संसद परिसरात मोर्चा पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याचे सांगण्यात आले.

गोंधळ थांबेना

nसंसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांचे सभागृहातील वर्तन योग्य नसल्याचे स्पष्ट करत टीका केली. या गोंधळादरम्यान चर्चेला उत्तर देण्यासाठी पीठासीन सभापती दगदम्बिका पाल यांनी वैष्णव यांचे नाव पुकारले. त्यानंतर गोंधळ अधिकच वाढत गेला.

पाल यांनी वारंवार शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ थांबत नसल्याने कामकाज तहकूब झाले.

खा. दुबेंनी माफी मागावी : काँग्रेस

विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे एका विदेशी गुंतवणूकदारासोबत संबंध जोडल्याबद्दल काँग्रेस पक्षाने भाजप खासदार निशिकांत दुबेंना लक्ष्य केले.

अदानी समूहाचा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांना बदनाम करण्याची जबाबदारी काही दलालांना दिली आहे. त्यामुळे दुबेंसारखे लोक गांधींवर टीका करत आहे.

दुबेंनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांकडे केली. 

सदस्यांनी नियमांचे पालन करावे : बिर्ला

संसद सदस्यांनी सभागृहाच्या नियमांचे व प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

सभागृहात येताना कोणत्याही सदस्यांनी फलक घेऊन येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :lok sabhaलोकसभाPriyanka Gandhiप्रियंका गांधीAmit Shahअमित शाह