शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:42 IST

अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे.

नवी दिल्लीः अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. भाजपाची ही खेळी अनेकांना पटलेली नाही. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंही यावर टीका केली.  केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.   महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. परंतु दोन्ही राजकीय पक्षांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार बनवलं नाही. तर पर्यायी सरकार बनवण्याचा ते दोघेही प्रयत्न करत राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी वारंवार केराची टोपली दाखवली. परंतु आज शिवसेना त्या काँग्रेसचंच समर्थन घेण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे काँग्रेसनंही भाजपा आणि शिवसेनेवर वारंवार सांप्रदायिकतेचा आरोप केला होता. आता तीच काँग्रेस आपल्या विचारधारेशी समझोता करण्यासाठी तयार आहे. ही तर लोकशाहीची विडंबना आहे. लोक जनशक्ती पार्टीवर बऱ्याचदा संधिसाधू असल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही कधीही जनतेच्या भावना आणि सिद्धांतांशी समझोता केलेला नाही. मला अभिमान आहे की, लोजपानं कोणतंही सरकार बनवण्यासाठी आडमुठी भूमिका घेतलेली नाही. पक्षाची स्थापना 2000 साली झाली. तेव्हापासून आम्ही निवडणूकपूर्व युती केली आणि एनडीए सोडून इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली नाही. भाजपानं महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं ते अगदीच चुकीचं आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019