शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:42 IST

अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे.

नवी दिल्लीः अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. भाजपाची ही खेळी अनेकांना पटलेली नाही. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंही यावर टीका केली.  केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.   महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. परंतु दोन्ही राजकीय पक्षांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार बनवलं नाही. तर पर्यायी सरकार बनवण्याचा ते दोघेही प्रयत्न करत राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी वारंवार केराची टोपली दाखवली. परंतु आज शिवसेना त्या काँग्रेसचंच समर्थन घेण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे काँग्रेसनंही भाजपा आणि शिवसेनेवर वारंवार सांप्रदायिकतेचा आरोप केला होता. आता तीच काँग्रेस आपल्या विचारधारेशी समझोता करण्यासाठी तयार आहे. ही तर लोकशाहीची विडंबना आहे. लोक जनशक्ती पार्टीवर बऱ्याचदा संधिसाधू असल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही कधीही जनतेच्या भावना आणि सिद्धांतांशी समझोता केलेला नाही. मला अभिमान आहे की, लोजपानं कोणतंही सरकार बनवण्यासाठी आडमुठी भूमिका घेतलेली नाही. पक्षाची स्थापना 2000 साली झाली. तेव्हापासून आम्ही निवडणूकपूर्व युती केली आणि एनडीए सोडून इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली नाही. भाजपानं महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं ते अगदीच चुकीचं आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019