शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 09:42 IST

अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे.

नवी दिल्लीः अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. भाजपाची ही खेळी अनेकांना पटलेली नाही. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंही यावर टीका केली.  केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.   महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. परंतु दोन्ही राजकीय पक्षांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार बनवलं नाही. तर पर्यायी सरकार बनवण्याचा ते दोघेही प्रयत्न करत राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी वारंवार केराची टोपली दाखवली. परंतु आज शिवसेना त्या काँग्रेसचंच समर्थन घेण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे काँग्रेसनंही भाजपा आणि शिवसेनेवर वारंवार सांप्रदायिकतेचा आरोप केला होता. आता तीच काँग्रेस आपल्या विचारधारेशी समझोता करण्यासाठी तयार आहे. ही तर लोकशाहीची विडंबना आहे. लोक जनशक्ती पार्टीवर बऱ्याचदा संधिसाधू असल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही कधीही जनतेच्या भावना आणि सिद्धांतांशी समझोता केलेला नाही. मला अभिमान आहे की, लोजपानं कोणतंही सरकार बनवण्यासाठी आडमुठी भूमिका घेतलेली नाही. पक्षाची स्थापना 2000 साली झाली. तेव्हापासून आम्ही निवडणूकपूर्व युती केली आणि एनडीए सोडून इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली नाही. भाजपानं महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं ते अगदीच चुकीचं आहे.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019