शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रेल्वेद्वारे काश्मीर खोऱ्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 22, 2017 03:26 IST

काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणि सद्य:स्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने आता रेल्वे मंत्रालयाचे माध्यम निवडले आहे.

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यातील अशांतता आणि सद्य:स्थिती बदलण्यासाठी मोदी सरकारने आता रेल्वे मंत्रालयाचे माध्यम निवडले आहे. पंतप्रधानांनी रेल्वे मंत्रालयाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, असे प्रयत्न करा की श्रीनगर, कारगिल आणि भारताचे अन्य भाग लवकरात लवकर रेल्वेमार्गाने जोडले जातील. काश्मीरमध्ये लोकांचे जाणे-येणे वाढले तर तिथला पर्यटन व्यवसाय सुधारेल आणि सध्याची परिस्थिती निवळायलाही मदत होईल.उधमपूर जवळ सर्वाधिक लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित सभेत काश्मीरच्या तरुणांना आवाहन करताना मोदींनी सवाल केला होता की काश्मीरचे भाग्य बदलण्यासाठी ‘टेररिझम हवे की टुरिझम?’ त्याला अनुसरून रेल्वेच्या प्रलंबित योजनांचा आढावा घेण्याच्या बैठकीत, भारतीय रेल्वेला मिशन काश्मीर सुरू करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. वैष्णोदेवीपर्यंत जाणारा कटरा बनिहाल लोहमार्ग तसेच लोहमार्गाचे काम केवळ श्रीनगरपर्यंतच नव्हे तर कारगिलपर्यंत येत्या तीन वर्षांत पोहोचले पाहिजे, यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या. जम्मू काश्मीरसाठी जे ८0 हजार कोटींचे विशेष पॅकेज केंद्र सरकारने देऊ केले आहे, त्यातला एक हिस्सा काश्मीरच्या लोहमार्गांसाठी राखून ठेवावा, असेही पंतप्रधानांनी सुचवले.