शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

महागाईवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: July 10, 2014 02:10 IST

विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सत्ताधारी भाजपाची टिंगल करताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘अच्छे दिना’चे वचन दिले होते ते दिवस कुठे गेले, असा सवाल केला. 
लोकसभेत महागाईवर नियम 193 अंतर्गत चर्चा झाली. यामध्ये सहभागी होताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आवश्यक वस्तूंच्या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ही दरवाढ रोखण्यासाठी साठेबाजांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चर्चेला प्रारंभ केला. भाजपाने निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे वचन दिले होते, ते दिवस गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. 
मालभाडे आणि पेट्रोल आणि डिङोलच्या किमती वाढवण्यात आल्याने वस्तूंच्या किमती वाढल्याचे माकपा नेते के. पी. करुणाकरण म्हणाले. 
विरोधकांना प्रत्युत्तर देताना, भाजपाचे अनुराग ठाकूर म्हणाले की, सध्या जी महागाई दिसत आहे, ती काँग्रेसप्रणित संपुआ सरकारच्या धोरणाचा परिणाम आहे. काँग्रेसने गेल्या दहा वर्षात महागाई रोखण्यासाठी काहीही केले नाही. त्यामुळे त्यांनी महागाईवर बोलू नये, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
च्अर्थमंत्री अरुण जेटली यांनी खाद्यान्नांच्या किमती नियंत्रणात असून, घाबरण्याची आवश्यकता नाही, असे वक्तव्य केले. 
च्विरोधकांनी कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी  कांद्याच्या निर्यातीवर पूर्णपणो बंदी घालण्याची मागणी यावेळी केली.