शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

बिहारमध्ये खासदारांवर हल्ला; ढसाढसा रडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 20:57 IST

पटना : केंद्रातील भाजप सरकारकडून एससी/एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे उत्तर भारतामध्ये काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला आहे. रस्ते आणि ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. या राज्यात काही ठिकाणी हिंसा झाल्याच्या बातम्या आता पुढे येत आहे. बिहारच्या मधेपुरा येथील खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेता पप्पू ...

पटना : केंद्रातील भाजप सरकारकडून एससी/एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे उत्तर भारतामध्ये काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला आहे. रस्ते आणि ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. या राज्यात काही ठिकाणी हिंसा झाल्याच्या बातम्या आता पुढे येत आहे. बिहारच्या मधेपुरा येथील खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेता पप्पू यादव यांनाही आज मारहाण झाली आहे.

पप्पू यादव यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांना मारहाण झाल्याचे सांगताना रडू कोसळले. महिला बचाव पदयात्रसाठी आपण मधुबनीमध्ये फिरत होतो. यावेळी आमच्या गाड्यांवर काहींनी हल्ला केला, तसेच कार्यकर्त्यांना त्यांच्या जातीवरून विचारत मारहाण केली. जेव्हा मी विरोध केला तेव्हा माझ्यावरही हल्ला करण्यात आला. सुरक्षा पथक नसते तर त्या लोकांनी ठार मारले असते, असा आरोप त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे. 

पप्पू यादव यांनी पुढे जिल्याचे पोलीस प्रमुख, महासंचालक आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप केला. 

यावेळी पप्पू यादव यांनी मुजफ्फरपूर वासनाकांडातील आरोपी ब्रजेश ठाकुर यांच्यावर या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप केला. जर वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या खासदाराला कंबरेला कट्टा लावून फिरणाऱ्या गुंडांकडून मारहाण होऊ शकते, तर सामान्य माणसाचे काय हाल असतील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच स्त्रीयांवरील अत्याचाराविरोधात आंदोलन करत असल्याने ब्रजेशच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. राज्य आणि केंद्र सरकार राज्यांमध्ये जातीय हिंसा पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीBharat Bandhभारत बंद