शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:14 IST

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला.

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत होता. या हल्ल्यात पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर १५ ब्राह्मोस डागले होते, याची माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका सूत्राने दिली.

९ आणि १० मेच्या रात्री, भारतीय हवाई दलाने इतर दलांच्या मदतीने पाकिस्तानच्या १३ पैकी ११ हवाई तळांना लक्ष्य केले आणि चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. भारतीय हवाई दलाच्या या कृतीमुळे असीम मुनीर यांच्या पाकिस्तानी सैन्यात चांगलीच खळबळ उडाली.

पाकिस्तानला हल्ला पडला महागात!पाकिस्तानी सैन्य भारतावर हल्ला करण्याचा सतत अयशस्वी प्रयत्न करत होते. या दरम्यान देशातील २६ ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यांनी लाहोरमध्ये असलेल्या शत्रूच्या रडारसह पाकिस्तानी हवाई संरक्षण रडारला लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानवर सुमारे १५ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली होती. भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये, पाकिस्तानचे भरपूर नुकसान झाले. या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व भारताचे संरक्षण प्रमुख  आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी संयुक्तपणे केले. ही रणनीती अशा प्रकारे बनवण्यात आली की, पाकिस्तान स्वतःच फसला गेला.

पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले!पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी तुर्की बनावटीचे ड्रोन आणि चिनी शस्त्रे वापरली. मात्र, ही शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे भारतीय संरक्षण यंत्रणेसमोर एक मिनिटही टिकू शकली नाहीत. पाकच्या ड्रोननी भारतीय सीमेत प्रवेश करताच संरक्षण यंत्रणांनी त्यांना हवेतच उडवून टाकलं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव का वाढला?२२ एप्रिल रोजीही पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६ मेच्या रात्री आणि ७ मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर करत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान बिथरला होता.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर