शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:14 IST

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला.

भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचे सतत अयशस्वी प्रयत्न करत होता. या हल्ल्यात पाकिस्तान ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत होता. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर १५ ब्राह्मोस डागले होते, याची माहिती संरक्षण मंत्रालयाशी संबंधित एका सूत्राने दिली.

९ आणि १० मेच्या रात्री, भारतीय हवाई दलाने इतर दलांच्या मदतीने पाकिस्तानच्या १३ पैकी ११ हवाई तळांना लक्ष्य केले आणि चीनची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. भारतीय हवाई दलाच्या या कृतीमुळे असीम मुनीर यांच्या पाकिस्तानी सैन्यात चांगलीच खळबळ उडाली.

पाकिस्तानला हल्ला पडला महागात!पाकिस्तानी सैन्य भारतावर हल्ला करण्याचा सतत अयशस्वी प्रयत्न करत होते. या दरम्यान देशातील २६ ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचे प्रयत्न करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यांनी लाहोरमध्ये असलेल्या शत्रूच्या रडारसह पाकिस्तानी हवाई संरक्षण रडारला लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानवर सुमारे १५ ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली होती. भारताच्या अचूक हल्ल्यांमध्ये, पाकिस्तानचे भरपूर नुकसान झाले. या संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व भारताचे संरक्षण प्रमुख  आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी संयुक्तपणे केले. ही रणनीती अशा प्रकारे बनवण्यात आली की, पाकिस्तान स्वतःच फसला गेला.

पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले!पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी तुर्की बनावटीचे ड्रोन आणि चिनी शस्त्रे वापरली. मात्र, ही शस्त्रे आणि क्षेपणास्त्रे भारतीय संरक्षण यंत्रणेसमोर एक मिनिटही टिकू शकली नाहीत. पाकच्या ड्रोननी भारतीय सीमेत प्रवेश करताच संरक्षण यंत्रणांनी त्यांना हवेतच उडवून टाकलं.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव का वाढला?२२ एप्रिल रोजीही पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ६ मेच्या रात्री आणि ७ मेच्या सकाळी ऑपरेशन सिंदूर करत, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कृतीनंतर पाकिस्तान बिथरला होता.

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर