शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी वाहनांवर हल्ला; पाच जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:32 IST

जेथे याआधी झाले अनेक हल्ले, तेथेच पुन्हा गेले जीव

- सुरेश एस डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कपूँछ/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात  घात लावून बसलेल्या सशस्त्र  दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन लष्करी वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले असून २ जखमी झाले. ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या घनदाट जंगलात जेथे याआधीही अनेक जवानांना जीव गमवावा लागला, तेथेच पुन्हा हल्ला झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास शोधमोहिमेच्या ठिकाणी जवानांना घेऊन जाणाऱ्या २ वाहनांवर सुरनकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या धत्यार वळणावर हा हल्ला झाला. घटनास्थळी एक लष्करी ट्रक आणि जिप्सी वाहनातून अतिरिक्त जवान पाठविण्यात आले, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी या दाेन वाहनांवर गोळीबार केला. त्यात पाच जवान शहीद झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. घातपाताच्या ठिकाणी आणखी जवान पाठवण्यात आले असून दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यात येत आहे. राजाैरी येथे २२ नाेव्हेंबर राेजी भीषण चकमक उडाली हाेती. त्यात ५ जवानांना वीरमरण प्राप्त झाले हाेते. त्यानंतर महिनाभरानी पुन्हा असा हल्ला झाला आहे.

घटनास्थळी भीषण दृश्यnघटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांतून दहशतवादी हल्ल्याची भीषणता पुढे आली. दहशतवाद्यांसाेबत जवानांची झटापटही झाली असण्याची शक्यता आहे.nरस्त्यावर रक्त, सैनिकांचे तुटलेले हेल्मेट आणि  वाहनांच्या फुटलेल्या काचा दिसतात. लक्ष्य केलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन दहशतवादी पळाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

एक तोफगोळा, २ ग्रेनेड जप्तजम्मू आणि काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात महामार्गाच्या बांधकामादरम्यान गुरुवारी एक जुना तोफगोळा आणि दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नंतर ते निकामी करण्यात आले.

जवानांसाठी  घनदाट जंगल घातक, अनेक झाले शहीदराजौरी आणि पूँछ जिल्ह्यांच्या सीमेवरील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानचा भाग घनदाट जंगलाचा आहे. तेथून पुढे चमरेर आणि भाटा धुरियन जंगल लागते. याच भागात या वर्षी २० एप्रिलला लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.मे महिन्यात,  चमरेर जंगलात ५ जवान शहीद झाले आणि एक प्रमुख अधिकारी जखमी झाला. एक विदेशी दहशतवादीही मारला गेला.ऑक्टोबर २०२१ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये नऊ जवान शहीद झाले होते. ११ ऑक्टोबरला चमरेर येथे एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह (जेसीओ) पाच जवान शहीद झाले, तर १४ ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन जवान मारले गेले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान