शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लष्करी वाहनांवर हल्ला; पाच जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 06:32 IST

जेथे याआधी झाले अनेक हल्ले, तेथेच पुन्हा गेले जीव

- सुरेश एस डुग्गरलोकमत न्यूज नेटवर्कपूँछ/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात  घात लावून बसलेल्या सशस्त्र  दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन लष्करी वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले असून २ जखमी झाले. ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या घनदाट जंगलात जेथे याआधीही अनेक जवानांना जीव गमवावा लागला, तेथेच पुन्हा हल्ला झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास शोधमोहिमेच्या ठिकाणी जवानांना घेऊन जाणाऱ्या २ वाहनांवर सुरनकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या धत्यार वळणावर हा हल्ला झाला. घटनास्थळी एक लष्करी ट्रक आणि जिप्सी वाहनातून अतिरिक्त जवान पाठविण्यात आले, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी या दाेन वाहनांवर गोळीबार केला. त्यात पाच जवान शहीद झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. घातपाताच्या ठिकाणी आणखी जवान पाठवण्यात आले असून दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यात येत आहे. राजाैरी येथे २२ नाेव्हेंबर राेजी भीषण चकमक उडाली हाेती. त्यात ५ जवानांना वीरमरण प्राप्त झाले हाेते. त्यानंतर महिनाभरानी पुन्हा असा हल्ला झाला आहे.

घटनास्थळी भीषण दृश्यnघटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांतून दहशतवादी हल्ल्याची भीषणता पुढे आली. दहशतवाद्यांसाेबत जवानांची झटापटही झाली असण्याची शक्यता आहे.nरस्त्यावर रक्त, सैनिकांचे तुटलेले हेल्मेट आणि  वाहनांच्या फुटलेल्या काचा दिसतात. लक्ष्य केलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन दहशतवादी पळाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

एक तोफगोळा, २ ग्रेनेड जप्तजम्मू आणि काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात महामार्गाच्या बांधकामादरम्यान गुरुवारी एक जुना तोफगोळा आणि दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नंतर ते निकामी करण्यात आले.

जवानांसाठी  घनदाट जंगल घातक, अनेक झाले शहीदराजौरी आणि पूँछ जिल्ह्यांच्या सीमेवरील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानचा भाग घनदाट जंगलाचा आहे. तेथून पुढे चमरेर आणि भाटा धुरियन जंगल लागते. याच भागात या वर्षी २० एप्रिलला लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.मे महिन्यात,  चमरेर जंगलात ५ जवान शहीद झाले आणि एक प्रमुख अधिकारी जखमी झाला. एक विदेशी दहशतवादीही मारला गेला.ऑक्टोबर २०२१ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये नऊ जवान शहीद झाले होते. ११ ऑक्टोबरला चमरेर येथे एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह (जेसीओ) पाच जवान शहीद झाले, तर १४ ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन जवान मारले गेले होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान