शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:49 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देजर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, कन्हैय्या कुमारने भाषण करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, देशातील सर्वात जुना पक्ष असल्याने आणि महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कन्हैय्याने म्हटले होते. तसेच, भारतीय संविधान आणि आयडिया ऑफ इंडियाचाही त्यांनी अनेकदा उल्लेख केला. राहुल गांधींच्य केरळमधील भाषणातही आज तोच सूर पाहायला मिळाला.  

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधीं भारत म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं. 

जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील, असे राहुल गांधींनी म्हटले.  .

ते म्हणतील भारत हा प्रदेश आहे, पण भारत हा विविध लोकांचं नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचं नात आहे, हिंदू-मुस्ली-शीख धर्मीयांचा आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचं नातं आहे. आपल्यातलं हेच नातं फोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत, ही मला समस्या वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, ते भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र, लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो, असेही राहुल गांधींनी म्हटले. 

काय म्हणाले होते कन्हैय्या कुमार 

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमारKeralaकेरळ