शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:49 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देजर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, कन्हैय्या कुमारने भाषण करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, देशातील सर्वात जुना पक्ष असल्याने आणि महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कन्हैय्याने म्हटले होते. तसेच, भारतीय संविधान आणि आयडिया ऑफ इंडियाचाही त्यांनी अनेकदा उल्लेख केला. राहुल गांधींच्य केरळमधील भाषणातही आज तोच सूर पाहायला मिळाला.  

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधीं भारत म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं. 

जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील, असे राहुल गांधींनी म्हटले.  .

ते म्हणतील भारत हा प्रदेश आहे, पण भारत हा विविध लोकांचं नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचं नात आहे, हिंदू-मुस्ली-शीख धर्मीयांचा आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचं नातं आहे. आपल्यातलं हेच नातं फोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत, ही मला समस्या वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, ते भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र, लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो, असेही राहुल गांधींनी म्हटले. 

काय म्हणाले होते कन्हैय्या कुमार 

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमारKeralaकेरळ