शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 15:49 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देजर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, कन्हैय्या कुमारने भाषण करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, देशातील सर्वात जुना पक्ष असल्याने आणि महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कन्हैय्याने म्हटले होते. तसेच, भारतीय संविधान आणि आयडिया ऑफ इंडियाचाही त्यांनी अनेकदा उल्लेख केला. राहुल गांधींच्य केरळमधील भाषणातही आज तोच सूर पाहायला मिळाला.  

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधीं भारत म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं. 

जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील, असे राहुल गांधींनी म्हटले.  .

ते म्हणतील भारत हा प्रदेश आहे, पण भारत हा विविध लोकांचं नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचं नात आहे, हिंदू-मुस्ली-शीख धर्मीयांचा आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचं नातं आहे. आपल्यातलं हेच नातं फोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत, ही मला समस्या वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, ते भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र, लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो, असेही राहुल गांधींनी म्हटले. 

काय म्हणाले होते कन्हैय्या कुमार 

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमारKeralaकेरळ