शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 09:36 IST

Meghalay news: राज्यपाल सत्यपाल मलिक गुवाहाटी विमानतळावरून मावळ्याच्या दिशेने परतत असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.

शिलाँग: मेघालयातील तणावादरम्यान राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सुरक्षा ताफ्यावर मंगळवारी संध्याकाळी शिलाँगमध्ये हल्ला करण्यात आला. राज्यपालांच्या सुरक्षा ताफ्यावर गुवाहाटी विमानतळावरून परतल्यानंतर ते मावलाई हायवेला जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दरम्यान, त्याच्या सुरक्षा ताफ्यावर दगडफेक झाली, ज्यात अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे. सुदैवानं, दगडफेकीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

मेघालयमध्ये प्रतिबंधित हिनट्रॅप नॅशनल लिबरेशन कौन्सिल (एचएनएलसी) चा माजी नेता चेस्टरफील्ड थांगखू याच्या मृत्यूनंतर मेघालयात हिंसाचार उसळला आहे. थांगखूने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळाली होती, पण त्यानंतर त्याचा चकमकीत मृत्यू झाला. थांगखूच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर परिसरात तणाव पसरला आहे.

मेघालयातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, 15 ऑगस्ट रोजी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. दुचाकीवरील हल्लेखोरांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर दोन मोलोटोव्ह कॉकटेलच्या बाटल्या फेकल्या होत्या. तपासात समोर आले की, हल्लेखोरांनी पहिली बाटली घराच्या पुढच्या भागात फेकली होती, तर दुसरी बाटली घराच्या मागील भागात फेकली होती. बॉम्ब फेकल्यानंतर तेथे आगही लागली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता राज्य सरकारने चार जिल्ह्यांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बंद करुन कर्फ्यू लावला आहे.

मुख्यमंत्र्यांनी न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी पोलीस चकमकीत माजी अतिरेकी नेत्याच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. चकमकीनंतर राज्याच्या राजधानीत कर्फ्यू लावण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संगमा म्हणाले की, उपमुख्यमंत्री प्रेस्टन टिनसॉन्ग यांच्या अध्यक्षतेखाली सरकार एक शांतता समिती स्थापन करेल, ज्यामध्ये नागरी समाज संघटनांचे प्रतिनिधी आणि इतरांना सदस्य म्हणून समाविष्ट केले जाईल.

शिलाँगमध्ये आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू 

सरकारने शिलाँगमध्ये संचारबंदी आणखी 24 तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता 18 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. मोबाईल इंटरनेट सेवाही पुढील 24 तासांसाठी बंद राहणार आहे. संगमा म्हणाले, "मंत्रिमंडळाच्या सदस्यांच्या सल्ल्यानुसार 13 ऑगस्टच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आयोग चौकशी कायद्याअंतर्गत न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला."

टॅग्स :Meghalaya Election Results 2018मेघालय निवडणूक निकाल 2018shillong-pcशिलांग