शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

भारतावर थेट हल्ला करा,  पाकव्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानांचे इम्रान खान यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 06:37 IST

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रजा फारुक हैदर हे नियंत्रण रेषेजवळील गावात आले होते.

मुजफ्फराबाद : आपल्या सैन्यासह भारतावर थेट हल्ला करा, असे आवाहन पाकव्याप्त काश्मिरातील पंतप्रधान रजा फारुक हैदर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना केले आहे. रजा फारुक हैदर हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. एकीकडे जगात कोरोनाचा प्रसार वाढला असताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केले.परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रजा फारुक हैदर हे नियंत्रण रेषेजवळील गावात आले होते. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मीडियाशी बोलताना हे विधान केले. पाकिस्तान सध्या नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. भारताकडून प्रत्युत्तरात होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांनी या गावात बंकर बनविले आहेत. भारत आता पीओकेमधील हवामानाची माहिती देत आहे. आम्हीही दिल्लीतील हवामानाचे अपडेट देणे सुरू करावे. सध्याच्या रणनीतीनुसार, काश्मीरला आगामी ७०० वर्षांत स्वातंत्र्य मिळू शकत नाही, असेही ते म्हणाले.ठोस कारवाई करामीडियाशी बोलताना हैदर म्हणाले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी आता ठोस कारवाई करण्याची गरज आहे. केवळ वक्तव्ये करून चालणार नाही. त्यापुढे जाऊन आपल्या सैन्याला भारतावर हल्ला करण्याचा आदेश द्यावा. आमचे हे कर्तव्य आहे की, आमच्या बहीण-भावांना सुरक्षित ठेवावे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान