शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Atal Bihari Vajpayee: जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाजपेयी हिंदीमध्ये बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:30 IST

1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते. सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळाली.

मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीतून भाषण करत एक नवा इतिहास रचला होता. 1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते.

सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळाली.त्यांच्यापूर्वी भारतीय किंवा जगभरातील कोणत्याही नेत्याने संयुक्त राष्ट्रात हिंदीतून भाषण केले नव्हते. मात्र वाजपेयी यांनी हिंदीतून भाषण करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी हिंदीतून भाषण केले मात्र वाजपेयी यांनी या चांगल्या प्रथेची सुरुवात केली होती.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

या भाषणामध्ये वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला शुभेच्छा देऊन सर्वांना संबोधित करायला सुरुवात केली होती. आमचे नवे सरकार सत्तेत येऊन केवळ सहाच महिने झाले आहेत मात्र आम्ही इतक्या कमीवेळात गतीमान पावले उचलून मूलभूत मानवाधिकार प्रस्थापित केले आहेत. देशातील भीती आणि दहशतीचे वातावरण आता संपले आहे असे त्यांनी सांगितले. घटनात्मक मार्गांचा वापर करुन लोकशाही आणि मूलभूत स्वातंत्र्याची पुनर्स्थापना करण्यात आल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

वसुधैव कुटुंबकम ही आमच्या देशातील लोकांची अत्यंत प्राचीन धारणा आहे. हे सर्व विश्व एक असून आपण त्याचे नागरीक आहोत यावर आमचा विश्वास आहे. सामान्य नागरिकाची प्रतिष्ठा आणि प्रगती याच्याशिवाय माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. संपूर्ण मानव समाजाला आपण न्याय देऊ शकतो का याकडे लक्ष देण्याची गरजही वाजपेयी यांनी व्यक्त केली होती. यावेळेस वाजपेयी यांनी आफ्रिकेतील अस्थैर्य आणि पश्चिम आशियातील नव्या संकटांची नांदी याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयीवेस्ट बँक आणि गाझामध्ये इस्रायल उभ्या करत असलेल्या नव्या वसाहतींमुळे प्रश्न निर्माण होतील व भविष्यात ते घातक ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. जीनिव्हा येथे परिषद बोलवून पीएलओला प्रतिनिधित्व देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. भाषणाचा शेवट 'जय हिंद' असा करण्याऐवजी 'जय जगत' असा करुन भारतीयांच्या सर्वसमावेशक भूमिकेचा पुन्हा एकदा सन्मान केला होता.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी