शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

Atal Bihari Vajpayee : अविश्रांत देशसेवा करीत राहू, १३ दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी वाजपेयींनी केलेले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:11 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी लोकसभेत केलेले भाषण अत्यंत ओजस्वी होते. ‘मी मृत्यूला नव्हे, तर जननिंदेला घाबरतो,’ असे ते या भाषणात म्हणाले होते.या भाषणातील वाजपेयी यांच्या भाषणाचा काही अंश :आम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या काही नशिबामुळे जिंकलेल्या नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाल्या आहेत आणि आज अचानक आम्हाला केवळ आणखी काही जागा मिळाल्या नाहीत, म्हणून टोमणे मारले जात आहे. ठीक आहे, ही आमची थोडीशी कमजोरी राहून गेली, हे मी मान्य करतो.राष्ट्रपतींनी आम्हाला (सरकार स्थापन्याची) संधी दिली. आम्ही ती संधी स्वीकारली. आम्ही यशस्वी झालो नाही; पण तो मुद्दा वेगळा आहे; परंतु आम्ही सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून येथे बसलेले असू आणि हे सभागृह चालविण्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावीच लागेल. हे कधीही विसरू नका आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सभागृह चालविण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, तुम्हाला सत्ता हवी आहे, तर तुम्ही सत्ता घ्या. आम्ही या देशासाठी काम करू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही कधीच स्वस्थ बसणार नाही.तुम्ही हा देश चालवू इच्छिता. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा, अभिनंदन तुमच्यासोबत आहे. आम्ही देशाच्या सेवेत आम्हाला पूर्णपणे झोकून देऊ. आम्ही बहुमतासमोर नतमस्तक आहोत. आम्ही देशसेवेचे जे व्रत घेतले आहे, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही विश्रांती घेणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी माझा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींकडे जात आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीlok sabhaलोकसभा