शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Atal Bihari Vajpayee : अविश्रांत देशसेवा करीत राहू, १३ दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी वाजपेयींनी केलेले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:11 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी लोकसभेत केलेले भाषण अत्यंत ओजस्वी होते. ‘मी मृत्यूला नव्हे, तर जननिंदेला घाबरतो,’ असे ते या भाषणात म्हणाले होते.या भाषणातील वाजपेयी यांच्या भाषणाचा काही अंश :आम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या काही नशिबामुळे जिंकलेल्या नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाल्या आहेत आणि आज अचानक आम्हाला केवळ आणखी काही जागा मिळाल्या नाहीत, म्हणून टोमणे मारले जात आहे. ठीक आहे, ही आमची थोडीशी कमजोरी राहून गेली, हे मी मान्य करतो.राष्ट्रपतींनी आम्हाला (सरकार स्थापन्याची) संधी दिली. आम्ही ती संधी स्वीकारली. आम्ही यशस्वी झालो नाही; पण तो मुद्दा वेगळा आहे; परंतु आम्ही सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून येथे बसलेले असू आणि हे सभागृह चालविण्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावीच लागेल. हे कधीही विसरू नका आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सभागृह चालविण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, तुम्हाला सत्ता हवी आहे, तर तुम्ही सत्ता घ्या. आम्ही या देशासाठी काम करू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही कधीच स्वस्थ बसणार नाही.तुम्ही हा देश चालवू इच्छिता. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा, अभिनंदन तुमच्यासोबत आहे. आम्ही देशाच्या सेवेत आम्हाला पूर्णपणे झोकून देऊ. आम्ही बहुमतासमोर नतमस्तक आहोत. आम्ही देशसेवेचे जे व्रत घेतले आहे, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही विश्रांती घेणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी माझा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींकडे जात आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीlok sabhaलोकसभा