शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

Atal Bihari Vajpayee : अविश्रांत देशसेवा करीत राहू, १३ दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी वाजपेयींनी केलेले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 04:11 IST

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी लोकसभेत केलेले भाषण अत्यंत ओजस्वी होते. ‘मी मृत्यूला नव्हे, तर जननिंदेला घाबरतो,’ असे ते या भाषणात म्हणाले होते.या भाषणातील वाजपेयी यांच्या भाषणाचा काही अंश :आम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या काही नशिबामुळे जिंकलेल्या नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाल्या आहेत आणि आज अचानक आम्हाला केवळ आणखी काही जागा मिळाल्या नाहीत, म्हणून टोमणे मारले जात आहे. ठीक आहे, ही आमची थोडीशी कमजोरी राहून गेली, हे मी मान्य करतो.राष्ट्रपतींनी आम्हाला (सरकार स्थापन्याची) संधी दिली. आम्ही ती संधी स्वीकारली. आम्ही यशस्वी झालो नाही; पण तो मुद्दा वेगळा आहे; परंतु आम्ही सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून येथे बसलेले असू आणि हे सभागृह चालविण्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावीच लागेल. हे कधीही विसरू नका आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सभागृह चालविण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, तुम्हाला सत्ता हवी आहे, तर तुम्ही सत्ता घ्या. आम्ही या देशासाठी काम करू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही कधीच स्वस्थ बसणार नाही.तुम्ही हा देश चालवू इच्छिता. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा, अभिनंदन तुमच्यासोबत आहे. आम्ही देशाच्या सेवेत आम्हाला पूर्णपणे झोकून देऊ. आम्ही बहुमतासमोर नतमस्तक आहोत. आम्ही देशसेवेचे जे व्रत घेतले आहे, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही विश्रांती घेणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी माझा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींकडे जात आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीlok sabhaलोकसभा